शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:04 IST

सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत,  अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली.

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत होते, तेव्हा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानींबरोबर बैठका सुरू होत्या. शरद पवार गटाचे आमदार अदानीची गाडी चालवत होते, तर उद्धव ठाकरे अदानींबरोबर बैठका घेत होते. सत्तेत होते, तेव्हा मलिदा काढण्याची भूमिका होती, सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत,  अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सत्तेत असताना उद्धव ठाकरे धारावीतील पात्र ६० हजार रहिवाशांना घरे देणार होते, आम्ही मात्र सर्व २ लाख रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय घेतला. धारावीकरांनी विरोधकांच्या राजकारणाला बळू पडू नये, ते स्वतःच्या स्वार्थासाठी दिशाभूल करत आहेत. 

मविआ सरकारने ४ प्रकल्पांनाच मान्यता दिली होती, तर आम्ही १२४ प्रकल्पांना मान्यता दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुन्हा सत्तेत येऊ

लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, मुली यांच्यासाठी आम्ही योजना लागू केल्या. दोन वर्षांत केलेल्या कामाचे समाधान आहे, ते लोकांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. त्यामुळे महायुती सरकार पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येईल.

नरेंद्र मोदी ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणतात त्यात काय चूक आहे. आपण एक का होऊ नये?, एक होऊन का मतदान करू नये? काँग्रेसचे नेते मात्र विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, पाकिस्तानची भाषा बोलतात म्हणून आपल्याला एक होण्याची गरज आहे. मोदींनी कोणत्या धर्माचा उल्लेख केला का?, असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

मतदान संपले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता

विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली, पण आम्ही या योजनेचे पैसे वेळेवर दिले. विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे