शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

"भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात"; संजय राऊत काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:32 IST

Sanjay Raut Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संभल मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. 

"राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे योग्य नाहीये", असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे संभलमधील वादावर भाष्य केले होते. सरसंघचालकांच्या भूमिकेबद्दल शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आले. या लोकांना मोहन भागवत यांनीच सत्तेवर बसवले आहे, अशी टीका राऊत यांनी केली.  

मुंबईत माध्यमांशी खासदार राऊत यांनी संवाद साधला. 'हे जे मंदिर मशीद सुरू आहे, ते थांबवलं पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले आहेत', याबद्दल संजय राऊतांना विचारण्यात आले. 

'राम मंदिर आंदोलनात फक्त भाजप आणि मोदीजींचेच योगदान नव्हते'

खासदार राऊत म्हणाले, "राम मंदिर हे एक आंदोलन राहिले आहे, या देशाचे. या आंदोलनात आणि राम मंदिराच्या निर्माणात सगळ्यांचेच योगदान आहे. फक्त भाजप आणि मोदीजींचेच योगदान नव्हते. मोदी तिथे कुठेच नव्हते."

राम मंदिर आंदोलनात काँग्रेसचे लोकही होते -राऊत

"त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. भाजपचे लोकही सामील होते, नव्हते असे नाही. अडवाणीजी होते. शिवसेना होती, बजरंग दल होता. विश्व हिंदू परिषद होती. इतकंच नाही, तर काँग्रेस पक्षाचे लोकही त्यात सहभागी होते. मी बघितले आहे. जर केंद्रात नृसिंहराव यांच्यासारखा नेता केंद्रात नसता किंवा डॉ. शंकर दयाळ शर्मा नसते, तर मंदिर झालेच नसते. आज मंदिर झालेच नसते", असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.  

रामाला मोदींनी आणले. मंदिर मोदींनी बनवले, हे खूप दुर्दैवी आहे. ही गोष्ट खरी आहे की, मंदिर बनवल्यामुळे कोणी नेता होत नाही. देश एक मंदिर आहे. देशाला बनवा. निवडणूक आली, तर मशीद खोदा, इथे खोदा, तिथे खोदा. इथे मंदिर आहे, तिथे मंदिर आहे, हे जे नाटक सुरू आहे ना, हा देशासाठी खूप मोठा धोका आहे." 

"मी सरसंघचालकांच्या विधानाशी मी सहमत आहे. पूर्ण देश सहमत आहे, पण आमचं हेही म्हणणं आहे की, भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात. तर तुम्ही सुद्धा जबाबदारी घ्या", असे संजय राऊत म्हणाले.   

 मोहन भागवत यांचे विधान काय?

"अयोध्येत राम मंदिर व्हावं असं हिंदुंना वाटायचं, त्याप्रमामे राम मंदिर पूर्णही झाले आहे. मात्र, राम मंदिरासारखं आंदोलन पुन्हा करून नेता होता येत नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे योग्य नाहीये", असे म्हणत मोहन भागवत यांनी संभलमधील वादाच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरBJPभाजपाcongressकाँग्रेस