शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 22:10 IST

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले.

मुंबई/बीड - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बीडमध्ये सभा घेतल्यापासून अजित पवार गटाकडूनही येथे सभा घेण्याची जय्यत तयारी सुरू होती. धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वात बीडमधील अजित पवार गटाच्या आमदारांनी आणि नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये जाहीर सभा घेतली. याप्रसंगी बोलताना अजित पवारांनी केवळ सत्तेत येण्याचं कारण सांगत, बीडकरांना मी कधीही अंतर पडू देणार नसल्याचे म्हटले. तसेच, कुणावरही थेट टीका करण्याचे अजित पवार यांनी टाळले. मात्र, काही जणांकडून गैरसमज पसरवला जात आहे, त्यात तसूभरही सत्य नाही, असे म्हणत शरद पवारांनी केलेल्या विधानावर अप्रत्यक्षपणे भूमिका मांडली. 

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले. तसचे, राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ उभारलं त्यातून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. आम्ही सत्तेत आलो आहोत, ते यासाठीच. सत्तेतून सर्वसामान्यांचा विकास आणि जनतेची कामं करण्याचं काम आम्ही करत आहोत. राज्यातील शेतकरी कांद्यांच्या निर्णयावरुन नाराज झाला होता. आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले, नेत्यांचे फोन आले. मी लगेच धनंजयला दिल्लीला पाठवलं आणि पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यावेळी, कांद्याचा दर वेगळाच ठरला होता. पण, सहकारमंत्री अमित शहांशी फोनवरुन बोलणं झालं. मग, शेतकऱ्यांच्या कांद्याला २४१० रुपये क्विंटर दर जाहीर करण्यात आला. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले. 

बीडचं पालकमंत्रीपदा राष्ट्रवादीलाच 

केंद्र आणि राज्य एकाच विचारांचं आहे. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत आमच्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. या ओळखीचा फायदा राज्यातील मागास भागातील विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आम्ही करणार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही राष्ट्रवादीलाच देण्याचं काम आपण करू, असे म्हणत एकप्रकारे बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदी धनंजय मुंडेंच असतील, असे संकेत अजित पवारांनी दिले. 

केंद्रात मोदी आणि राज्यात महायुती सरका

आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आपण भाजपा-शिवसेना महायुतीसोबत लढवणार आहोत. केंद्रात मोदींचं सरकार आणि राज्यात महायुतीचं राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणत महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वेगळा निर्णय घ्यायचा ते घेऊ, असेही ते म्हणाले.

आमचा मार्ग बहुजनांच्या प्रगतीसाठीचा

सत्तेत राहून बहुजन समाजाच्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. वेगळा निर्णय घेतल्यावर पहिल्यादा टीका केली जाते. मात्र, या टीकेला कामातून उत्तर देणं ही माझी आणि आमच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. खबीर प्रशासन राबविण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात. कधी ते व्यक्तिगत असतात, कधी ते प्रशासकीय कामकाजासाठी असतात. एकदा निर्णय घेतला की तो राबवायचा असतो, त्यातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. सकारात्मक राजकारण हा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मार्ग आहे, बहुजनांच्या प्रगतीसाठी आम्ही तो वापरणार हा शब्दही मी तुम्हाला देतो, असे अजित पवार यांनी म्हटलं.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाDhananjay Mundeधनंजय मुंडे