शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 22:10 IST

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले.

मुंबई/बीड - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बीडमध्ये सभा घेतल्यापासून अजित पवार गटाकडूनही येथे सभा घेण्याची जय्यत तयारी सुरू होती. धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वात बीडमधील अजित पवार गटाच्या आमदारांनी आणि नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये जाहीर सभा घेतली. याप्रसंगी बोलताना अजित पवारांनी केवळ सत्तेत येण्याचं कारण सांगत, बीडकरांना मी कधीही अंतर पडू देणार नसल्याचे म्हटले. तसेच, कुणावरही थेट टीका करण्याचे अजित पवार यांनी टाळले. मात्र, काही जणांकडून गैरसमज पसरवला जात आहे, त्यात तसूभरही सत्य नाही, असे म्हणत शरद पवारांनी केलेल्या विधानावर अप्रत्यक्षपणे भूमिका मांडली. 

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले. तसचे, राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ उभारलं त्यातून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. आम्ही सत्तेत आलो आहोत, ते यासाठीच. सत्तेतून सर्वसामान्यांचा विकास आणि जनतेची कामं करण्याचं काम आम्ही करत आहोत. राज्यातील शेतकरी कांद्यांच्या निर्णयावरुन नाराज झाला होता. आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले, नेत्यांचे फोन आले. मी लगेच धनंजयला दिल्लीला पाठवलं आणि पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यावेळी, कांद्याचा दर वेगळाच ठरला होता. पण, सहकारमंत्री अमित शहांशी फोनवरुन बोलणं झालं. मग, शेतकऱ्यांच्या कांद्याला २४१० रुपये क्विंटर दर जाहीर करण्यात आला. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले. 

बीडचं पालकमंत्रीपदा राष्ट्रवादीलाच 

केंद्र आणि राज्य एकाच विचारांचं आहे. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत आमच्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. या ओळखीचा फायदा राज्यातील मागास भागातील विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आम्ही करणार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही राष्ट्रवादीलाच देण्याचं काम आपण करू, असे म्हणत एकप्रकारे बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदी धनंजय मुंडेंच असतील, असे संकेत अजित पवारांनी दिले. 

केंद्रात मोदी आणि राज्यात महायुती सरका

आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आपण भाजपा-शिवसेना महायुतीसोबत लढवणार आहोत. केंद्रात मोदींचं सरकार आणि राज्यात महायुतीचं राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणत महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वेगळा निर्णय घ्यायचा ते घेऊ, असेही ते म्हणाले.

आमचा मार्ग बहुजनांच्या प्रगतीसाठीचा

सत्तेत राहून बहुजन समाजाच्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. वेगळा निर्णय घेतल्यावर पहिल्यादा टीका केली जाते. मात्र, या टीकेला कामातून उत्तर देणं ही माझी आणि आमच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. खबीर प्रशासन राबविण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात. कधी ते व्यक्तिगत असतात, कधी ते प्रशासकीय कामकाजासाठी असतात. एकदा निर्णय घेतला की तो राबवायचा असतो, त्यातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. सकारात्मक राजकारण हा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मार्ग आहे, बहुजनांच्या प्रगतीसाठी आम्ही तो वापरणार हा शब्दही मी तुम्हाला देतो, असे अजित पवार यांनी म्हटलं.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाDhananjay Mundeधनंजय मुंडे