शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 22:10 IST

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले.

मुंबई/बीड - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बीडमध्ये सभा घेतल्यापासून अजित पवार गटाकडूनही येथे सभा घेण्याची जय्यत तयारी सुरू होती. धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वात बीडमधील अजित पवार गटाच्या आमदारांनी आणि नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये जाहीर सभा घेतली. याप्रसंगी बोलताना अजित पवारांनी केवळ सत्तेत येण्याचं कारण सांगत, बीडकरांना मी कधीही अंतर पडू देणार नसल्याचे म्हटले. तसेच, कुणावरही थेट टीका करण्याचे अजित पवार यांनी टाळले. मात्र, काही जणांकडून गैरसमज पसरवला जात आहे, त्यात तसूभरही सत्य नाही, असे म्हणत शरद पवारांनी केलेल्या विधानावर अप्रत्यक्षपणे भूमिका मांडली. 

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले. तसचे, राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ उभारलं त्यातून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. आम्ही सत्तेत आलो आहोत, ते यासाठीच. सत्तेतून सर्वसामान्यांचा विकास आणि जनतेची कामं करण्याचं काम आम्ही करत आहोत. राज्यातील शेतकरी कांद्यांच्या निर्णयावरुन नाराज झाला होता. आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले, नेत्यांचे फोन आले. मी लगेच धनंजयला दिल्लीला पाठवलं आणि पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यावेळी, कांद्याचा दर वेगळाच ठरला होता. पण, सहकारमंत्री अमित शहांशी फोनवरुन बोलणं झालं. मग, शेतकऱ्यांच्या कांद्याला २४१० रुपये क्विंटर दर जाहीर करण्यात आला. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले. 

बीडचं पालकमंत्रीपदा राष्ट्रवादीलाच 

केंद्र आणि राज्य एकाच विचारांचं आहे. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत आमच्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. या ओळखीचा फायदा राज्यातील मागास भागातील विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आम्ही करणार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही राष्ट्रवादीलाच देण्याचं काम आपण करू, असे म्हणत एकप्रकारे बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदी धनंजय मुंडेंच असतील, असे संकेत अजित पवारांनी दिले. 

केंद्रात मोदी आणि राज्यात महायुती सरका

आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आपण भाजपा-शिवसेना महायुतीसोबत लढवणार आहोत. केंद्रात मोदींचं सरकार आणि राज्यात महायुतीचं राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणत महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वेगळा निर्णय घ्यायचा ते घेऊ, असेही ते म्हणाले.

आमचा मार्ग बहुजनांच्या प्रगतीसाठीचा

सत्तेत राहून बहुजन समाजाच्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. वेगळा निर्णय घेतल्यावर पहिल्यादा टीका केली जाते. मात्र, या टीकेला कामातून उत्तर देणं ही माझी आणि आमच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. खबीर प्रशासन राबविण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात. कधी ते व्यक्तिगत असतात, कधी ते प्रशासकीय कामकाजासाठी असतात. एकदा निर्णय घेतला की तो राबवायचा असतो, त्यातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. सकारात्मक राजकारण हा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मार्ग आहे, बहुजनांच्या प्रगतीसाठी आम्ही तो वापरणार हा शब्दही मी तुम्हाला देतो, असे अजित पवार यांनी म्हटलं.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाDhananjay Mundeधनंजय मुंडे