शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

...अन्यथा राज साहेब उशीर होईल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 14:24 IST

स्व:ताच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मनसे कार्यकर्ते पर्याय शोधण्याचा निर्णय घेऊ शकतात

मोसिन शेख 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने, मनसे पदाधिकारी आणि विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षातील नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्वता:च अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मनसे कार्यकर्ते पर्याय शोधण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा पाहायला मिळत असून, याची सुरवात औरंगाबाद पासून सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा राज ठाकरे यांची झाली असली तरीही मात्र या निवडणुकीत त्यांनी उमेदवार न दिल्याने मनसेला एकही खासदार निवडून आणता आला नाही. त्यानंतर राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा पाहायला मिळत होती. मात्र आचारसंहिता लागायला अवघ्या एक महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असताना सुद्धा, राज यांची भूमिका अजूनही स्पष्ट होऊ न शकल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

अन्य पक्षाप्रमाणे मनसेमधून सुद्धा अनेकजण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर अनेक ठिकाणी मनसे नेतेमंडळीकडून तशी तयारी सुद्धा सुरु आहे. मात्र पक्षाची भूमिका काय असणार आहे, याचा खुलासा होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे अनेकजण पर्यायाच्या शोधात असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मनसेचे पदाधिकारी पर्याय शोधत असल्याचे बोलले जात आहे.

त्यातच नुकतेच औरंगाबादमध्ये जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी पदाचा राजीनामा दिला असून, त्यापाठोपाठ आता अजूनही काही पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याचा तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वेळीच राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर पक्षातील नेते स्वता:चा अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी पर्याय शोधतील अशी चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे 'राज साहेब लवकर निर्णय घ्या अन्यथा उशीर होईल', अशी भावना मनसेचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.