शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:31 IST

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे.

मुंबई - आज संपूर्ण देशात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. याच मुहूर्तावर राज्यातील प्रमुख मंदिरे देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली होत आहेत. मात्र नुसती मंदिरं उघडून नव्हे तर जनतेचे प्रश्न सुटले तरच खऱ्या अर्थी देवीचा कृपाशीर्वाद मिळाला असे मानता येईल. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी यासाठी पुढाकार घेतला असून आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे त्या ही गाऱ्हाणी मांडणार आहेत. देवीपुढे गाऱ्हाणं घालून तरी लोकांचा आवाज हे सरकार ऐकेल अशी अपेक्षा बाळगून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार वारंवार जनतेची फसवणूक करत आहे. त्यामुळे जनतेचा आवाज या बहिऱ्या सरकारपर्यंत देवीसाठी घातलेल्या  गाऱ्हाण्याच्या माध्यमातून पोहचावा अशी यामागे आशा असल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात महिलांवरील वाढलेले अत्याचार, मराठवाड्यात आलेला ओला दुष्काळ, मुंबईसह उपनगरात रस्त्यांवर पडलेले खड्डे, कोरोनाच्या निमित्ताने आणलेले निर्बंध, मुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांकडून देण्यात येणारी कोरडी आश्वासने, शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा असे अनेक विषय ही गाऱ्हाणी घालून मांडले जाणार असल्याची माहिती मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसेNavratriनवरात्री