शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

"राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:31 IST

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे.

मुंबई - आज संपूर्ण देशात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. याच मुहूर्तावर राज्यातील प्रमुख मंदिरे देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली होत आहेत. मात्र नुसती मंदिरं उघडून नव्हे तर जनतेचे प्रश्न सुटले तरच खऱ्या अर्थी देवीचा कृपाशीर्वाद मिळाला असे मानता येईल. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी यासाठी पुढाकार घेतला असून आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे त्या ही गाऱ्हाणी मांडणार आहेत. देवीपुढे गाऱ्हाणं घालून तरी लोकांचा आवाज हे सरकार ऐकेल अशी अपेक्षा बाळगून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार वारंवार जनतेची फसवणूक करत आहे. त्यामुळे जनतेचा आवाज या बहिऱ्या सरकारपर्यंत देवीसाठी घातलेल्या  गाऱ्हाण्याच्या माध्यमातून पोहचावा अशी यामागे आशा असल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात महिलांवरील वाढलेले अत्याचार, मराठवाड्यात आलेला ओला दुष्काळ, मुंबईसह उपनगरात रस्त्यांवर पडलेले खड्डे, कोरोनाच्या निमित्ताने आणलेले निर्बंध, मुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांकडून देण्यात येणारी कोरडी आश्वासने, शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा असे अनेक विषय ही गाऱ्हाणी घालून मांडले जाणार असल्याची माहिती मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसेNavratriनवरात्री