शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ज्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर, त्यांच्याकडून हिंदुत्व शिकायचं?; मनसेचा सुषमा अंधारेंवर निशाणा, शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:49 IST

मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. यानंतर आता मनसेनेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. 

"एक रणरागिणी, एक दिवसाची नर्स... यांचा मेंदू डोक्यात आहे की गुडघ्यात? हे कळतं नाही" असं म्हणत मनसेने खोचक टीका केली आहे. तसेच "दुसऱ्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर आणि त्यांच्याकडून शिवसैनिकांनी हिंदुत्व शिकायचं? कुठे अधोगतीला नेताय शिवसेना? बाळासाहेबांचे विचार कुठे होते?" असा सवाल करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच "मुंबईची तुंबई होताना हातावर हात धरून बसलात, लोकांना आयुष्यभर खड्ड्यात चालायला लावलं" असं टीकास्त्रही सोडलं आहे. 

"कुठे अधोगतीला नेताय शिवसेना? बाळासाहेबांचे विचार कुठे होते?"

मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी दसरा मेळाव्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. "ज्यांनी आमच्या देवी-देवतांना शिव्या घातल्या, ज्यांना पाहिल्यावर डोळ्यासमोर अंधारी येते असे लोक हिंदुत्वाबद्दल शिवर्तीर्थावर काल बोलत होते. एक रणरागिणी, एक दिवसाची नर्स... यांचा मेंदू डोक्यात आहे की गुडघ्यात? हे कळतं नाही. दुसऱ्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर आणि त्यांच्याकडून शिवसैनिकांनी हिंदुत्व शिकायचं? कुठे अधोगतीला नेताय शिवसेना? बाळासाहेबांचे विचार कुठे होते?"

"तुम्ही कोणाच्या खुपसला नाही का?"

"एकनाथ शिंदेंना शिव्या घालायच्या, 40 आमदारांना शिव्या घालायच्या... सगळ्यांनी तुमच्याच पाठीत खंजीर खुपसला तुम्ही कोणाच्या खुपसला नाही का? सगळे वाईट, तुम्ही एकटेच चांगले... का चांगले? तर तुम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचार केला, तुम्ही मुंबईतील लोकांना आयुष्यभर खड्ड्यात चालायला लावलं. मुंबईची रोज तुंबई होत असताना तुम्ही हातावर हात धरून बसलात. कोरोनात जनता होरपळली होती तेव्हा तुम्ही घरी बसला होता. कशासाठी म्हणायचं तुम्हाला चांगलं?" असा संतप्त सवालही संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेKishori Pednekarकिशोरी पेडणेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना