शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

“न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता...”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:15 IST

MNS Prakash Mahajan News: महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.

MNS Prakash Mahajan News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे बीड येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून थेट भगवानगडावर पोहोचले. श्रीक्षेत्र भगवानगड (ता. पाथर्डी) येथे धनंजय मुंडे यांनी प्रथम संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. मुंडे यांनी शास्त्रींसोबत भोजन केले आणि तिथेच मुक्काम केला. यानंतर नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. 

धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल भाष्य केले. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे, अशी चर्चा आहे; यावर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले की, भक्कमपणे पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे.

न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले अन् आता...

धनंजय मुंडे यांना मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे.  मीडिया ट्रायल का केली जात आहे, त्याचा विचार धनंजय मुंडेंनी करायला हवा. बीड जिल्हा परिषदेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास दिला होता आणि आता तेच भांडत आहेत. स्वतः ला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते. न्यायाचार्य असणाऱ्या डॉ. नामदेव शास्त्रींनी न्याय देताना स्त्री-पुरुष असा भेद केला. महाराजांनी आपली प्रतिज्ञा तोडली आणि एक राजकीय भूमिका घेतली, या शब्दांत प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आणि आरोप केले. 

दरम्यान, आता धनंजय मुंडे संकटात आहेत असे वाटत नाही. मीडियातून तसा भास निर्माण केला जातो आहे. नामदेव शास्त्री आणि समाज त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे, त्याबाबत कोणी बोलावे असे नाही, असे प्रकाश महाजन म्हणाले. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विरोधकांनी चांगलीच लावून धरली आहे. सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आग्रहाने केली जात आहे.

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस