शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

"कालची मुलाखत म्हणजे WWF मॅच, लागत कुणालाच नाही", संदीप देशपांडेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:46 IST

"बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार कुणाच्या मालकीचा नसतो.''

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यभरातून शिवसैनिक आणि सेना नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली. त्या मुलाखतीवरुन आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

'मुलाखत म्हणजे WWEची मॅच'संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग काल(26 जुलै) रोजी प्रदर्शित झाला आणि दुसरा भाग आज(27) जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर गंभीर आरोप केले. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, ''कालच्या भागासारखाच हा भाग होता, वेगळं काहीच वाटलं नाही. जशी WWF ची मॅच असते, मारामारी होते पण लागत कुणालाच नाही, तशी ही मुलाखत होती,'' असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला आहे. 

'बाळासाहेब एक विचार'देशपांडे पुढे म्हणतात, ''काल उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कुणीही घेऊ नका. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे आहेत. हिंदू महासभा, काँग्रेस किंवा प्रकाश आंबेडकर कधी म्हणाले का? की तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. ती आमची संपत्ती आहे, मूळात ही लोकं म्हणजे विचार आहेत. बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार कुणाच्या मालकीचा नसतो,'' असंही देशपांडे म्हणाले.

'आमचे नगरसेवक फोडले तेव्हा...'देशपांडे पुढे म्हणतात की, ''निरोगी राजकारण म्हणजे नेमकं काय? ते मला कळलं नाही. दुसऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, दुसऱ्यांच्या मागे क्राइम ब्रँच लावायची, याला ते निरोगी राजकारण म्हणतात का? आपण कुठल्या पद्धतीचे राजकारण केले? पैसे देऊन, फूस लावून लोकांचे नगरसेवक फोडले, अशाप्रकारचे निरोगी राजकारण त्यांना अपेक्षित आहे का?'' असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMNSमनसे