शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

राज ठाकरेंना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीय होते; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 11:03 IST

२०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली. 

मुंबई - आदित्य ठाकरेंवरील आरोपावर पाठराखण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले पण राज ठाकरेंवर टीका केली होती. आता मनसेनेउद्धव ठाकरेंवर पलटवार करत आता आदित्य ठाकरेंबाबत जी काही एसआयटी चौकशी लावली आहे ती विरोधकांनी लावलीय, परंतु राज ठाकरेंच्या वेळी त्यांना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीयच होते असा निशाणा साधला आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, गेल्या २५ वर्षापासून उद्धव ठाकरे सेटलमेंट करतायेत. टीका केली म्हणून झोंबण्याचे कारण काय? आम्ही जे आंदोलन केले त्याचा निकाल आला. मराठी पाट्या आंदोलन झाले, ज्या लोकांनी टोलनाके बंद करू असं आश्वासन दिले पण सत्तेत आल्यावर काय केले? ऑक्सिजनचा कुठलाही संबंध नसताना हायवे कंपनीला कंत्राट कसे मिळाले. बीएमसीमध्ये सत्तेत असताना रस्ते कंत्राटासाठी ६ कंपन्या सोडून सातवी कंपनी का आली नाही. मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा यांनी प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी चमचेगिरी करण्याची सवय आहे. २०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली. 

तसेच ज्यांच्या मानेला आणि मनाला पट्टा बांधलाय त्यांना शालीचे वजन आणि विचारही पेलणार नाहीत.त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल न बोललेलं बरे.आतापर्यंत या लोकांनी जी आंदोलन केली.याआधी रिलायन्सच्या इलेक्ट्रिक दरवाढीविरोधात आंदोलन केले त्याचे पुढे काय झाले? यूएलसीबद्दल आंदोलन केले त्यानंतर कुठल्या बिल्डरसोबत सेटलमेंट झाल्यावर आंदोलन मागे घेतले? नाणार प्रकल्पासाठी आंदोलन केले. मग बारसूला रिफायनरी प्रकल्प करावा यासाठी पत्र लिहणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणासोबत सेटलमेंट केली? ज्यावेळी अंबानी समुहाला सौदी अरेबिया कंपनीचे शेअर्स मिळाले त्यानंतर तुम्ही बारसूसाठी पत्र लिहिले.मग तेव्हा कुठली सेटलमेंट केली. त्यामुळे कोण कोणाचे चमचे आहेत हे जगाला माहिती आहे. अदानींच्या सांगण्यानेच आंदोलन करताय का असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, सामान्य माणसांच्या प्रश्नावर कुणी बोलताना दिसत नाही. कांदा निर्यात बंदीने शेतकऱ्यांचे हाल झालेत. अवकाळी पावसानं शेतीचे नुकसान झाले आहे. शहरात गेली २ वर्ष लोकप्रतिनिधी नाही. महापालिकेच्या तिजोरीचा पैसा सगळे अधिकारी लुटून खातायेत त्याकडे कुणी लक्ष देत नाही.  कोण कोणाच्या लग्नात गेले, कुणी कुठे डान्स केला यापेक्षा लोकांच्या प्रश्नावर लक्ष दिले पाहिजे असं मनसे नेते देशपांडे म्हणाले.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे