शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भाजपा कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 14:51 IST

मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या थर्ड डीग्रीवरुन राज ठाकरे संतप्त

पुणेः मुंबईतील खड्ड्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मुलांना पोलिसांनी 'थर्ड डीग्री' दिल्याच्या प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

मुंबई, ठाण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. खड्ड्यांच्या पाण्याने आंघोळ करून, खड्ड्यांभोवती रांगोळी काढून, प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसैनिक प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न करताहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नवी मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली होती. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना थर्ड डीग्री देण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.

मिश्रा, शर्मा नावाचे पोलीस अधिकारी आमच्या मुलांना थर्ड डीग्री देतात. खड्ड्यांसाठी आंदोलन केलं म्हणून  त्यांना पट्ट्याने मारतात. समजा, उद्या तुमची सत्ता गेल्यानंतर, भाजपाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?, असा राग राज ठाकरेंनी व्यक्त केला. मनसैनिकांना मारणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याची सत्ता भंकस आहे का?नाणार प्रकल्पाला आपण आधीच विरोध केला असल्याचं स्पष्ट करत, राज यांनी शिवसेना-भाजपा सरकारला लक्ष्य केलं. सत्तेतला एक पक्ष म्हणतो नाणार होणार आणि एक म्हणतो होणार नाही. राज्याची सत्ता भंकस आहे की मजाक? हे दोघं आपल्याला येडे बनवताहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. 

इथे रेल्वेचे अपघात होताहेत आणि हे निघालेत बुलेट ट्रेन आणि हायपरलूप आणायला?, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना