शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

भाजपा कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 14:51 IST

मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या थर्ड डीग्रीवरुन राज ठाकरे संतप्त

पुणेः मुंबईतील खड्ड्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मुलांना पोलिसांनी 'थर्ड डीग्री' दिल्याच्या प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

मुंबई, ठाण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. खड्ड्यांच्या पाण्याने आंघोळ करून, खड्ड्यांभोवती रांगोळी काढून, प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसैनिक प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न करताहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नवी मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली होती. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना थर्ड डीग्री देण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.

मिश्रा, शर्मा नावाचे पोलीस अधिकारी आमच्या मुलांना थर्ड डीग्री देतात. खड्ड्यांसाठी आंदोलन केलं म्हणून  त्यांना पट्ट्याने मारतात. समजा, उद्या तुमची सत्ता गेल्यानंतर, भाजपाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?, असा राग राज ठाकरेंनी व्यक्त केला. मनसैनिकांना मारणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याची सत्ता भंकस आहे का?नाणार प्रकल्पाला आपण आधीच विरोध केला असल्याचं स्पष्ट करत, राज यांनी शिवसेना-भाजपा सरकारला लक्ष्य केलं. सत्तेतला एक पक्ष म्हणतो नाणार होणार आणि एक म्हणतो होणार नाही. राज्याची सत्ता भंकस आहे की मजाक? हे दोघं आपल्याला येडे बनवताहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. 

इथे रेल्वेचे अपघात होताहेत आणि हे निघालेत बुलेट ट्रेन आणि हायपरलूप आणायला?, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना