शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:57 IST

देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज ते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत राज ठाकरेंनी भूमिका बदलतो या आरोपावरून टोला लगावला. 

मुंबई - माझ्यासोबत राहणार असाल तर ठाम राहा. आपल्याला जे महाराष्ट्रात मराठी माणसं आणि हिंदुसाठी करायचे ते करणारच आहे. तुमचा राजकीय अभ्यास दांडगा असला पाहिजे. तुम्ही समोरच्याला पुरून उरलं पाहिजे असं सांगत राज ठाकरेंनीभाजपा नेत्यांच्या गाठीभेटीवरून होणाऱ्या चर्चेवर भाष्य केले. 

वरळीतील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी सांगितले की, मला भाजपचे लोक भेटायला येतात, मी त्यांना काय नाही म्हणू ? तुमच्या घरी चहा प्यायला येतो असं कोणी म्हणलं तर तुम्ही नाही म्हणाल का? बरं माझ्याकडे चहा प्यायला कोणीही आले तरी मी तुम्हाला कधी विकलं नाही, मी पुन्हा सांगतो कोणीही भेटून गेलं तरी तुमच्यावरचं प्रेम आणि पक्षाची भूमिका याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

तसेच १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष ते मुस्लिम लीग सोबत युती केली, पुढे काँग्रेससोबत पण युती केली होती. थोडक्यात त्या त्या वेळेला गरज बघून युती केली. सगळ्यांनी भूमिका बदलल्या, वाट्टेल त्या युत्या केल्या..त्या चालतात..पण त्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार..हा कुठला न्याय? भाजपाने महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना पुढे पक्षात घेतलं आणि त्यांना मंत्री केलं. नारायण राणे, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण आज ज्यांच्यावर आरोप केले ते मंत्रिमंडळात आहेत.  मी जे बोललो, ते कधी मागे घेतले नाही. जे बोललो होतो त्याला आधार होते. जे चांगले कराल त्याला चांगले बोलतो, वाईट कराल त्यावर बोललो. फडणवीसांनी, किरीट सोमय्यांनी किती लोकांवर आरोप केले, ते सगळे भाजपमध्ये आले, लोक हल्ली देव पाण्यात घालून बसतात की किरीट सोमय्यांनी किंवा फडणवीसांनी आरोप केले की पक्षात घेतात, पुढे मंत्री करतात. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत भूमिका बदलतो या आरोपांवर राज ठाकरेंनी भाष्य केले. 

पक्ष संघटनेत आणणार आचारसंहिता

दरम्यान, येत्या काळात पक्षात खालपासून वरपर्यंत आचारसंहिता आणणार आहे. पुढील १५ दिवसांत प्रत्येकाला जबाबदारी आणि आचारसंहिता आखून देईन. मी अनेक पराभव पाहिलेत. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेल्यांचं नेतृत्व मला करायचं नाहीये. माझ्यासोबत राहायचं असेल तर ठाम राहा. या राज्यातील मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचं आहे ते मी करणार, ते आपलं स्वप्न आहे. वेळ लागेल पण करणार हे नक्की असं सांगत राज यांनी पक्ष संघटनेत बदलाचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस