शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:57 IST

देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज ते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत राज ठाकरेंनी भूमिका बदलतो या आरोपावरून टोला लगावला. 

मुंबई - माझ्यासोबत राहणार असाल तर ठाम राहा. आपल्याला जे महाराष्ट्रात मराठी माणसं आणि हिंदुसाठी करायचे ते करणारच आहे. तुमचा राजकीय अभ्यास दांडगा असला पाहिजे. तुम्ही समोरच्याला पुरून उरलं पाहिजे असं सांगत राज ठाकरेंनीभाजपा नेत्यांच्या गाठीभेटीवरून होणाऱ्या चर्चेवर भाष्य केले. 

वरळीतील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी सांगितले की, मला भाजपचे लोक भेटायला येतात, मी त्यांना काय नाही म्हणू ? तुमच्या घरी चहा प्यायला येतो असं कोणी म्हणलं तर तुम्ही नाही म्हणाल का? बरं माझ्याकडे चहा प्यायला कोणीही आले तरी मी तुम्हाला कधी विकलं नाही, मी पुन्हा सांगतो कोणीही भेटून गेलं तरी तुमच्यावरचं प्रेम आणि पक्षाची भूमिका याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

तसेच १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष ते मुस्लिम लीग सोबत युती केली, पुढे काँग्रेससोबत पण युती केली होती. थोडक्यात त्या त्या वेळेला गरज बघून युती केली. सगळ्यांनी भूमिका बदलल्या, वाट्टेल त्या युत्या केल्या..त्या चालतात..पण त्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार..हा कुठला न्याय? भाजपाने महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना पुढे पक्षात घेतलं आणि त्यांना मंत्री केलं. नारायण राणे, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण आज ज्यांच्यावर आरोप केले ते मंत्रिमंडळात आहेत.  मी जे बोललो, ते कधी मागे घेतले नाही. जे बोललो होतो त्याला आधार होते. जे चांगले कराल त्याला चांगले बोलतो, वाईट कराल त्यावर बोललो. फडणवीसांनी, किरीट सोमय्यांनी किती लोकांवर आरोप केले, ते सगळे भाजपमध्ये आले, लोक हल्ली देव पाण्यात घालून बसतात की किरीट सोमय्यांनी किंवा फडणवीसांनी आरोप केले की पक्षात घेतात, पुढे मंत्री करतात. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत भूमिका बदलतो या आरोपांवर राज ठाकरेंनी भाष्य केले. 

पक्ष संघटनेत आणणार आचारसंहिता

दरम्यान, येत्या काळात पक्षात खालपासून वरपर्यंत आचारसंहिता आणणार आहे. पुढील १५ दिवसांत प्रत्येकाला जबाबदारी आणि आचारसंहिता आखून देईन. मी अनेक पराभव पाहिलेत. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेल्यांचं नेतृत्व मला करायचं नाहीये. माझ्यासोबत राहायचं असेल तर ठाम राहा. या राज्यातील मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचं आहे ते मी करणार, ते आपलं स्वप्न आहे. वेळ लागेल पण करणार हे नक्की असं सांगत राज यांनी पक्ष संघटनेत बदलाचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस