शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचा चिखल झालाय, चीड व्यक्त करा; "एक सही संतापाची", राज्यात मनसेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:58 IST

येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यात मनसेचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत.

मुंबई – २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड उलाथापालथ झाली. निवडणुकीत सोबत असलेले भाजपा-शिवसेना निकालानंतर वेगळे झाले. राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यानंतर शिवसेना फुटली, राष्ट्रवादीही फुटली. पक्ष आणि चिन्हासह एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मूळ पक्षावरच घाव घातला. राज्यातील या घडामोडींमध्ये भाजपाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. राज्यातील याच राजकीय स्थितीवर आता सर्वसामान्य लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे याला जनआंदोलन बनवण्यासाठी राज ठाकरेंच्यामनसेकडून एक सही संतापाची या आंदोलनाची हाक राज्यभरात देण्यात आली आहे.

येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यात मनसेचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, सध्या ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती पाहतोय त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. ज्या महाराष्ट्राने लोकांना विचार दिले. तिथे ही परिस्थिती झालीय. एकदा तुम्ही मत दिले, तर आम्ही तुम्हाला गृहित धरणार, आम्हाला वाटेल ते करणार या मानसिकतेत राजकीय पक्ष आलेले आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच राज्यातील या राजकीय परिस्थितीबाबत तुमच्या मनात चीड आहे. तुमच्या मनात राग आहे, संताप आहे. त्यामुळेच या रागाला, संतापाला वाट करून द्यायची असेल तर येत्या ८ आणि ९ जुलैला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन घेत आहोत. जर या राजकीय घडामोडींवर तुमचा राग, संताप आणि चीड असेल तर तुम्हाला एक सही करायची आहे. त्यामुळे या संपूर्ण उपक्रमाला एक सही संतापाची असं नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनातून लोकांनी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यावे असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे.

महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील दिगू टिपणीस झालाय राज ठाकरे

अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी सरकारमध्ये जात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. राज म्हणाले होते की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असं राज ठाकरेंनी विचारले होते.

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवार