शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचा चिखल झालाय, चीड व्यक्त करा; "एक सही संतापाची", राज्यात मनसेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:58 IST

येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यात मनसेचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत.

मुंबई – २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड उलाथापालथ झाली. निवडणुकीत सोबत असलेले भाजपा-शिवसेना निकालानंतर वेगळे झाले. राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यानंतर शिवसेना फुटली, राष्ट्रवादीही फुटली. पक्ष आणि चिन्हासह एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मूळ पक्षावरच घाव घातला. राज्यातील या घडामोडींमध्ये भाजपाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. राज्यातील याच राजकीय स्थितीवर आता सर्वसामान्य लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे याला जनआंदोलन बनवण्यासाठी राज ठाकरेंच्यामनसेकडून एक सही संतापाची या आंदोलनाची हाक राज्यभरात देण्यात आली आहे.

येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यात मनसेचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, सध्या ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती पाहतोय त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. ज्या महाराष्ट्राने लोकांना विचार दिले. तिथे ही परिस्थिती झालीय. एकदा तुम्ही मत दिले, तर आम्ही तुम्हाला गृहित धरणार, आम्हाला वाटेल ते करणार या मानसिकतेत राजकीय पक्ष आलेले आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच राज्यातील या राजकीय परिस्थितीबाबत तुमच्या मनात चीड आहे. तुमच्या मनात राग आहे, संताप आहे. त्यामुळेच या रागाला, संतापाला वाट करून द्यायची असेल तर येत्या ८ आणि ९ जुलैला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन घेत आहोत. जर या राजकीय घडामोडींवर तुमचा राग, संताप आणि चीड असेल तर तुम्हाला एक सही करायची आहे. त्यामुळे या संपूर्ण उपक्रमाला एक सही संतापाची असं नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनातून लोकांनी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यावे असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे.

महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील दिगू टिपणीस झालाय राज ठाकरे

अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी सरकारमध्ये जात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. राज म्हणाले होते की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असं राज ठाकरेंनी विचारले होते.

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवार