शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

MLC Election: आवाssज कुणाचा?... शिवसेनेनं 'असा' केला 'डबल धमाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 14:11 IST

भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले.

मुंबईः 'झीरो टू हिरो' म्हणजे काय, हे शिवसेनेनं आज विधानपरिषद निवडणुकीत दाखवून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, भाजपाच्या दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा कार्यकाळ संपत असल्याने परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान झालं होतं. त्यात दोन जागांवर आपला झेंडा फडकवून सेनेनं 'डबल धमाका' केला आहे. या विजयातून त्यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहेच, पण भाजपालाही इंगा दाखवला आहे.

शिवसेनेनं नाशिकमध्ये मिळवलेला दणदणीत विजय हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. कारण, ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला - अॅड. शिवाजी सहाणे यांना काँग्रेससोबत भाजपानेही पाठिंबा दिला होता. असं असतानाही, ६४४ पैकी ३९९ मतं मिळवून शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. वास्तविक, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना आणि मित्रांचं संख्याबळ २१२ इतकंच होतं. परंतु, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सगळी जुळवाजुळव व्यवस्थित केली आणि राष्ट्रवादीसोबत भाजपाही तोंडावर आपटली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील भुजबळ गटानं शिवसेनेला साथ दिल्यानं त्यांचं बळ चांगलंच वाढलं होतं. त्याशिवाय, भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ही जागा थोडक्यात गमवावी लागली होती. त्यावेळी भुजबळांनी राष्ट्रवादीच्या जयंत जाधवांसाठी गणित जुळवलं होतं, यावेळी त्यांच्याच समर्थकांनी ते बिघडवलं, अशी चर्चा आहे. 

परभणी-हिंगोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद जास्त होती. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाबा जानी दुर्राणी यांनी इथून सहज विजय मिळवला होता. परंतु, या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली. इथेच त्यांचं समीकरण बिघडलं आणि शिवसेनेचं भाग्य उघडलं. राष्ट्रवादीच्या नाराज मंडळींनी आपली मतं शिवसेनेच्या पारड्यात टाकली आणि विप्लव बाजोरिया यांनी बाजी मारली. भाजपाची मदतही इथे निर्णायक ठरली. विप्लव बाजोरिया यांना २५६ मतं मिळाली, तर काँग्रेसच्या सुरेश देशमुखांना २२१ पर्यंत मजल मारता आली. राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडेच ठेवली असती, कदाचित चित्र वेगळं असतं. पण त्यांची चूक सेनेच्या पथ्यावर पडली. 

तिकडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधानपरिषद मतदारसंघात, नारायण राणेंनी राष्ट्रवादीच्या अनिकेत सुनील तटकरे यांना पाठिंबा दिल्यानं शिवसेनेच्या राजीव साबळेंना पराभव पत्करावा लागला आहे. हा पराभव नक्कीच त्यांचा 'स्वाभिमान' दुखावणारा असला, तरी विधानपरिषेदतील संख्या दोनने वाढल्यानं त्यांची मान उंचावलीही आहे. या निवडणुकीनंतर, शिवसेनेच्या विधानपरिषदेतील आमदारांची संख्या ९ वरून ११ झाली आहे. 

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने आपल्या अमरावती (प्रवीण पोटे) आणि चंद्रपूर (रामदास आंबटकर) या दोन जागा राखल्या आहेत.  

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे