शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

घाबरलेला, बिथरलेला आजारी माणूस दिसला; आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 14:03 IST

तुम्हाला घाबरणारा महाराष्ट्रात कोण नाही. उगाच धमक्या व्यासपीठावरून देऊ नका असं नितेश राणेंनी सांगितले.

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत भाजपावर घणाघात केल्यानंतर आता भाजपा नेतेही आक्रमक उत्तर देत आहे. शिवसेनेच्या सभेत ना मुख्यमंत्री ना पक्षप्रमुख दिसले. घाबरलेला बिथरलेला आजारी माणूस दिसले. कालच्या भाषणानं मला त्यांची दया येत आहे. मी त्यांच्या डॉक्टरांना विनंती करतो. औषधांचा डोस कमी करावा. आजारी माणसाला इतका त्रास कुटुंब का देतंय? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला आहे.

नितेश राणे(BJP Nitesh Rane) म्हणाले की, चंद्रकांत खैरे जे बोलले ते अतिशय योग्य बोलले. नवनीत राणा प्रकरणी खैरेंनी शिवसैनिकांची अक्लल गुडघ्यात असते बोलले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रमुखांची अक्कल कुठे असेल हे सांगण्याची गरज वाटत नाही. दुसऱ्या व्यंगाबद्दल भाष्य करता मग तुमच्या मुलाच्या आवाजावरून म्याव म्याव आवाज काढला तर वाईट का वाटतं? उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) उभे राहिले असते तर हवेने उडून दिले गेले असते असं आम्ही म्हणायचं का? तुम्हाला घाबरणारा महाराष्ट्रात कोण नाही. उगाच धमक्या व्यासपीठावरून देऊ नका असं त्यांनी सांगितले.

तसेच मातोश्री नावावर ज्याने हेराफेरी केली तो काल सभेत होता. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांच्या आशीर्वादानेच घोटाळे होतात हे सिद्ध झाले आहे. जे मुंबईला अक्षरश: लुटले त्यांच्याविरोधात लढा सुरूच राहणार आहे. भ्रष्टाचारी माणसाचं समर्थन करावं लागत आहे. नवाब मलिकांनी दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार केले. त्याला समर्थन करून बाळासाहेबांच्या भूमिकेचा अपमान केला. संभाजीनगर नामांतर करण्याची गरज काय? असं म्हणताय. त्यामुळे त्यांच्यावर उपचारांची गरज आहे असंही नितेश राणेंनी सांगितले.

त्याचसोबत मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करणं हेच चुकीचे आहे. तुम्हाला टोमणे मारता येतात. पालघरच्या साधूंची हत्या झाली त्यांना अद्याप न्याय मिळत नाही. ज्या रझा अकादमीनं महाराष्ट्रात दंगली घडवल्या त्यावर बंदी घालण्याचं तुमचं हिंदुत्व नाही का? तुमच्या सोयीनुसार हिंदुत्वाची चौकट उभी करताय. शिवसैनिकांनी सोमय्यांवर हल्ला केला म्हणून सुरक्षा दिली. नवनीत राणांवर हल्ला झाला. सुरक्षा का देण्यात येते त्याचा विचार करा. वरूण सरदेसाईंना सुरक्षा का दिलीय याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी द्यावं अशी मागणी नितेश यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रात मविआ नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलतात. पण मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कामगारांचे प्रश्न यावर कुणी बोलत नाही. ओबीसींचं राजकीय नुकसान होतंय त्यावर मुख्यमंत्री काय बोलत नाही. वीज, शेतकरी यांच्यावर बोलत नाही. बाहेरचे मुद्दे वापरायचे पण तुमच्या बुडाखाली काय जळतंय त्यावर बोलणार नाही असा टोला राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लगावला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा