शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

आमदार सत्तेस्थापनेत व्यस्त तर मतदारसंघ वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 16:22 IST

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले असताना सुद्धा अजूनही सरकार स्थापन होऊ शकले नाहीत. सर्वच पक्षांनी नवनिर्वाचित आमदारांना सुरक्षित वेगवगेळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना सुद्धा, नवनिर्वाचित आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मतदारसंघात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. असे असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी याबाबतीत गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार करताना याआधी अनेकदा पाहायला मिळाले आहे.

राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता, शिवसनेने आपले आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवली आहे. तर काँग्रेसने आपली नवनिर्वाचित आमदार जयपूरला पाठवली आहे. त्यात भाजपच्या आमदारांसुद्धा मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा मुंबईतच ठाण मांडून बसले आहेत.

मतदारसंघातील समस्या घेऊन नागरिक लोकप्रतिनिधीकडे जात असतात. मात्र बहुतेक आमदार हे सद्या मतदारसंघात नसल्याने आपल्या अडचणी कुणाला सांगाव्यात असा प्रश्न लोकांना पडत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, पिक विमा अशा अनेक समस्या असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्तास्थापनेत व्यस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.