शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सत्तेस्थापनेत व्यस्त तर मतदारसंघ वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 16:22 IST

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले असताना सुद्धा अजूनही सरकार स्थापन होऊ शकले नाहीत. सर्वच पक्षांनी नवनिर्वाचित आमदारांना सुरक्षित वेगवगेळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना सुद्धा, नवनिर्वाचित आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मतदारसंघात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. असे असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी याबाबतीत गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार करताना याआधी अनेकदा पाहायला मिळाले आहे.

राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता, शिवसनेने आपले आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवली आहे. तर काँग्रेसने आपली नवनिर्वाचित आमदार जयपूरला पाठवली आहे. त्यात भाजपच्या आमदारांसुद्धा मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा मुंबईतच ठाण मांडून बसले आहेत.

मतदारसंघातील समस्या घेऊन नागरिक लोकप्रतिनिधीकडे जात असतात. मात्र बहुतेक आमदार हे सद्या मतदारसंघात नसल्याने आपल्या अडचणी कुणाला सांगाव्यात असा प्रश्न लोकांना पडत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, पिक विमा अशा अनेक समस्या असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्तास्थापनेत व्यस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.