शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आमदार सत्तेस्थापनेत व्यस्त तर मतदारसंघ वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 16:22 IST

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले असताना सुद्धा अजूनही सरकार स्थापन होऊ शकले नाहीत. सर्वच पक्षांनी नवनिर्वाचित आमदारांना सुरक्षित वेगवगेळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना सुद्धा, नवनिर्वाचित आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मतदारसंघात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. असे असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी याबाबतीत गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार करताना याआधी अनेकदा पाहायला मिळाले आहे.

राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता, शिवसनेने आपले आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवली आहे. तर काँग्रेसने आपली नवनिर्वाचित आमदार जयपूरला पाठवली आहे. त्यात भाजपच्या आमदारांसुद्धा मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा मुंबईतच ठाण मांडून बसले आहेत.

मतदारसंघातील समस्या घेऊन नागरिक लोकप्रतिनिधीकडे जात असतात. मात्र बहुतेक आमदार हे सद्या मतदारसंघात नसल्याने आपल्या अडचणी कुणाला सांगाव्यात असा प्रश्न लोकांना पडत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, पिक विमा अशा अनेक समस्या असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्तास्थापनेत व्यस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.