शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

निवडणूक हरलो, जिंकलो तरी...; मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:37 IST

आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत.

जळगाव - आमच्यावर बोलण्यासाठी काही लोकं सोडलेत, जा त्यांना बदनाम करा. कुणी कितीही आमच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत असाल तरी ३० वर्ष शिवसेना संघटना वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. निवडणूक हरलो, जिंकलो तरी खांद्यावरचा भगवा खाली उतरवला नाही. परंतु आता ३-४ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले लोकं आमच्यावर टीका करतायेत. आम्ही मंत्रिपद सोडून गुवाहाटीला गेलो. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे २०-२२ आमदार गेलो होतो. तुम्ही त्या आमदारांना परत बोलवा असं सांगितले. परंतु तुम्हाला जायचं तर जा असं आम्हाला म्हटलं. आपल्यामधून १ माणूस फुटत असला तर मला रात्रभर झोप लागत नाही. आमचा कार्यकर्ता निघून गेला तर आम्हाला वाईट वाटतं. त्याला थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे ४० आमदार गेले तरी त्यांना जा असं म्हटलं गेले. त्यावेळी ४० आमदारांची किंमत त्यांना कळायला हवी होती. ५५ पैकी ४० आमदार बंड करतात तेव्हा त्यांचे म्हणणं ऐकलं पाहिजे होते. आता कुटुंबशाहीचं राजकारण राहिले नाही. सार्वजनिक विचार करणाऱ्याचं राजकारण सुरू आहे असंही त्यांनी सांगितले. 

आम्ही जनतेनं मान्य केलेले राजेआत्ताचा राजा राजाच्या पोटी जन्माला येत नाही. आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. १९९९ पासून मी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून येतोय. ९० साली पहिला आमदार देणारा आम्ही कार्यकर्ते आहोत. वानराची सेना आली असं म्हणून काँग्रेसवाले हिणवत होते. त्याच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. मी दादा कोंडकेचा चित्रपट पाहणारा गावरान माणूस आहे. चुकून राजकारणात आलो. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने इथवर आलोय असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. 

पाण्यात राजकारण करत नाहीआम्ही ५०-५० हजार मतांनी निवडून आलोय, आम्ही सगळ्यांना पाणी देतो. आता सार्वजनिक विचार करणाऱ्या नेत्यांचे राजकारण झाले आहे. पाण्याचे खाते मिळाल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा १५ हजार कोटींचा बजेट पाणी पुरवठा विभागाचा झाला. राज्यातील ३४ हजार गावांना पाणी पोहचवणार आहे. सगळ्या पक्षातील लोकांना आम्ही पाणी देतो. पाण्यात राजकारण करत नाही असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेGulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना