शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक हरलो, जिंकलो तरी...; मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:37 IST

आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत.

जळगाव - आमच्यावर बोलण्यासाठी काही लोकं सोडलेत, जा त्यांना बदनाम करा. कुणी कितीही आमच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत असाल तरी ३० वर्ष शिवसेना संघटना वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. निवडणूक हरलो, जिंकलो तरी खांद्यावरचा भगवा खाली उतरवला नाही. परंतु आता ३-४ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले लोकं आमच्यावर टीका करतायेत. आम्ही मंत्रिपद सोडून गुवाहाटीला गेलो. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे २०-२२ आमदार गेलो होतो. तुम्ही त्या आमदारांना परत बोलवा असं सांगितले. परंतु तुम्हाला जायचं तर जा असं आम्हाला म्हटलं. आपल्यामधून १ माणूस फुटत असला तर मला रात्रभर झोप लागत नाही. आमचा कार्यकर्ता निघून गेला तर आम्हाला वाईट वाटतं. त्याला थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे ४० आमदार गेले तरी त्यांना जा असं म्हटलं गेले. त्यावेळी ४० आमदारांची किंमत त्यांना कळायला हवी होती. ५५ पैकी ४० आमदार बंड करतात तेव्हा त्यांचे म्हणणं ऐकलं पाहिजे होते. आता कुटुंबशाहीचं राजकारण राहिले नाही. सार्वजनिक विचार करणाऱ्याचं राजकारण सुरू आहे असंही त्यांनी सांगितले. 

आम्ही जनतेनं मान्य केलेले राजेआत्ताचा राजा राजाच्या पोटी जन्माला येत नाही. आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. १९९९ पासून मी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून येतोय. ९० साली पहिला आमदार देणारा आम्ही कार्यकर्ते आहोत. वानराची सेना आली असं म्हणून काँग्रेसवाले हिणवत होते. त्याच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. मी दादा कोंडकेचा चित्रपट पाहणारा गावरान माणूस आहे. चुकून राजकारणात आलो. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने इथवर आलोय असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. 

पाण्यात राजकारण करत नाहीआम्ही ५०-५० हजार मतांनी निवडून आलोय, आम्ही सगळ्यांना पाणी देतो. आता सार्वजनिक विचार करणाऱ्या नेत्यांचे राजकारण झाले आहे. पाण्याचे खाते मिळाल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा १५ हजार कोटींचा बजेट पाणी पुरवठा विभागाचा झाला. राज्यातील ३४ हजार गावांना पाणी पोहचवणार आहे. सगळ्या पक्षातील लोकांना आम्ही पाणी देतो. पाण्यात राजकारण करत नाही असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेGulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना