शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:34 IST

जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं भुजबळांनी म्हटलं.

कर्जत -  आपला पक्ष हा नवीन पक्ष नाही तर १९९९ साली स्थापन झालेला पक्ष हाच आहे. पहिला प्रदेशाध्यक्ष मीच आहे. २००४ साली काही ना काही सुरुच आहेत. आता तळ्यातमळ्यात करण्याऐवजी निर्णय घेण्याची गरज होती. अशा घटना एकदा नाही तर अनेकदा झाल्या. भाजपसोबत सत्तेत अनेक लोक गेले त्यांनी त्यांची भूमिका बदलेली नाही. भाजप आणि शिवसेना यांची विचारधारा एक असतानाही जेव्हा शिवसेनेसोबत गेलो ती भूमिका मान्य झाली पण भाजपसोबत जाण्याची भूमिका मान्य नाही. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला सत्तेत जावे लागेल. जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं असा थेट प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. कर्जत इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. 

छगन भुजबळ म्हणाले की, अलीकडे ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे स्पष्ट झाले. जनतेने या निवडणुकीतून आपल्या पक्ष आणि आपल्या निर्णय योग्य असल्यावर शिक्कामोर्तब केला.सध्या पक्षाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असली तरी न्याय आपल्याच बाजूने होईल आणि निश्चितपण आपला विजय होईल हा विश्वास आहे. आता आपण कार्यालयात येण्याऐवजी गावपातळीवर, शहरपातळीवर पक्षाची पाळमूळ घट्ट रोवली पाहिजे. अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करणे हे आपले काम आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी राज्यातील जनतेच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण इतर कोणात्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ही भूमिका प्रत्येकांची आहे.आज आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याचे काम होत असताना जनतेलाही वेठीस धरण्याचे काम होत आहे. राज्यकर्ता हा सगळ्यांचा असतो तो कोणत्याही एका समाजाचा नसतो. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय मिळायला हवा. जर कोणावर अन्याय होत असेल तर आपण गप्प बसून कसे चालेल. घरांवर हल्ले होत असलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्याला सर्व जाती, धर्मांना, शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे असंही छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार