शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:34 IST

जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं भुजबळांनी म्हटलं.

कर्जत -  आपला पक्ष हा नवीन पक्ष नाही तर १९९९ साली स्थापन झालेला पक्ष हाच आहे. पहिला प्रदेशाध्यक्ष मीच आहे. २००४ साली काही ना काही सुरुच आहेत. आता तळ्यातमळ्यात करण्याऐवजी निर्णय घेण्याची गरज होती. अशा घटना एकदा नाही तर अनेकदा झाल्या. भाजपसोबत सत्तेत अनेक लोक गेले त्यांनी त्यांची भूमिका बदलेली नाही. भाजप आणि शिवसेना यांची विचारधारा एक असतानाही जेव्हा शिवसेनेसोबत गेलो ती भूमिका मान्य झाली पण भाजपसोबत जाण्याची भूमिका मान्य नाही. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला सत्तेत जावे लागेल. जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं असा थेट प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. कर्जत इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. 

छगन भुजबळ म्हणाले की, अलीकडे ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे स्पष्ट झाले. जनतेने या निवडणुकीतून आपल्या पक्ष आणि आपल्या निर्णय योग्य असल्यावर शिक्कामोर्तब केला.सध्या पक्षाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असली तरी न्याय आपल्याच बाजूने होईल आणि निश्चितपण आपला विजय होईल हा विश्वास आहे. आता आपण कार्यालयात येण्याऐवजी गावपातळीवर, शहरपातळीवर पक्षाची पाळमूळ घट्ट रोवली पाहिजे. अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करणे हे आपले काम आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी राज्यातील जनतेच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण इतर कोणात्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ही भूमिका प्रत्येकांची आहे.आज आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याचे काम होत असताना जनतेलाही वेठीस धरण्याचे काम होत आहे. राज्यकर्ता हा सगळ्यांचा असतो तो कोणत्याही एका समाजाचा नसतो. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय मिळायला हवा. जर कोणावर अन्याय होत असेल तर आपण गप्प बसून कसे चालेल. घरांवर हल्ले होत असलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्याला सर्व जाती, धर्मांना, शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे असंही छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार