शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:34 IST

जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं भुजबळांनी म्हटलं.

कर्जत -  आपला पक्ष हा नवीन पक्ष नाही तर १९९९ साली स्थापन झालेला पक्ष हाच आहे. पहिला प्रदेशाध्यक्ष मीच आहे. २००४ साली काही ना काही सुरुच आहेत. आता तळ्यातमळ्यात करण्याऐवजी निर्णय घेण्याची गरज होती. अशा घटना एकदा नाही तर अनेकदा झाल्या. भाजपसोबत सत्तेत अनेक लोक गेले त्यांनी त्यांची भूमिका बदलेली नाही. भाजप आणि शिवसेना यांची विचारधारा एक असतानाही जेव्हा शिवसेनेसोबत गेलो ती भूमिका मान्य झाली पण भाजपसोबत जाण्याची भूमिका मान्य नाही. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला सत्तेत जावे लागेल. जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं असा थेट प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. कर्जत इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. 

छगन भुजबळ म्हणाले की, अलीकडे ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे स्पष्ट झाले. जनतेने या निवडणुकीतून आपल्या पक्ष आणि आपल्या निर्णय योग्य असल्यावर शिक्कामोर्तब केला.सध्या पक्षाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असली तरी न्याय आपल्याच बाजूने होईल आणि निश्चितपण आपला विजय होईल हा विश्वास आहे. आता आपण कार्यालयात येण्याऐवजी गावपातळीवर, शहरपातळीवर पक्षाची पाळमूळ घट्ट रोवली पाहिजे. अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करणे हे आपले काम आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी राज्यातील जनतेच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण इतर कोणात्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ही भूमिका प्रत्येकांची आहे.आज आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याचे काम होत असताना जनतेलाही वेठीस धरण्याचे काम होत आहे. राज्यकर्ता हा सगळ्यांचा असतो तो कोणत्याही एका समाजाचा नसतो. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय मिळायला हवा. जर कोणावर अन्याय होत असेल तर आपण गप्प बसून कसे चालेल. घरांवर हल्ले होत असलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्याला सर्व जाती, धर्मांना, शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे असंही छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार