शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

‘मिलिंद नार्वेकरांनी एकट्याने ५० टक्के शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’, रामदास कदमांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 17:10 IST

Ramdas Kadam: जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. ५० टक्के शिवसेना एकट्या मिलिंद नार्वेकर यांनी संपवली आणि ते उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यावर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे. जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. ५० टक्के शिवसेना एकट्या मिलिंद नार्वेकर यांनी संपवली आणि ते उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रामदास कदम यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की,  ५० टक्के शिवसेना ही मिलिंद नार्वेकर यांनी संपवली. उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. कुठलीही व्यक्ती थेट उद्धव ठाकरेंना भेटली तर ते मिलिंद नार्वेकर यांना आवडत नसे. त्याचा काटा कसा काढायचा. त्याला पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटू द्यायचं नाही, याचं व्यवस्थित प्लॅनिंग मिलिंद नार्वेकर करायचे, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

तसेच उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांनीच त्यांचा घात केल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. ते म्हणाले की, जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. मग सुभाष देसाई असतील. मिलिंद नार्वेकर असतील, आणखी काही मंडळींची नावं मी पुढे घेणार आहे. उद्धवजींच्या सोबत राहून त्यांना अंधारात ठेवून त्यांनी पक्षाचं नुकसान केलं. निवडणुका आल्या की, पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांना भेटा. मिलिंद नार्वेकरांना भेटण्याआधी कुणी थेट पुढे गेला तर त्याचं तिकीट कापलं गेलं म्हणून समजायचं, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुणी बोलत नाही. आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? बोललं तर संपला तो माणून, आमदार असेल तर तिकिट नाही, नगरसेवक असेल तर तिकिट नाही, अशी परिस्थिती होती, असा दावा रामदास कदम यांनी केला.

दरम्यान, मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही बोलायचं नाही आहे. मात्र महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे. मी आदित्य ठाकरेंना विचारतो की, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर त्य़ांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का, शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते का? असा रोखठोक प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMilind Narvekarमिलिंद नार्वेकर