शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘मिलिंद नार्वेकरांनी एकट्याने ५० टक्के शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’, रामदास कदमांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 17:10 IST

Ramdas Kadam: जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. ५० टक्के शिवसेना एकट्या मिलिंद नार्वेकर यांनी संपवली आणि ते उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यावर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे. जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. ५० टक्के शिवसेना एकट्या मिलिंद नार्वेकर यांनी संपवली आणि ते उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रामदास कदम यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की,  ५० टक्के शिवसेना ही मिलिंद नार्वेकर यांनी संपवली. उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. कुठलीही व्यक्ती थेट उद्धव ठाकरेंना भेटली तर ते मिलिंद नार्वेकर यांना आवडत नसे. त्याचा काटा कसा काढायचा. त्याला पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटू द्यायचं नाही, याचं व्यवस्थित प्लॅनिंग मिलिंद नार्वेकर करायचे, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

तसेच उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांनीच त्यांचा घात केल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. ते म्हणाले की, जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. मग सुभाष देसाई असतील. मिलिंद नार्वेकर असतील, आणखी काही मंडळींची नावं मी पुढे घेणार आहे. उद्धवजींच्या सोबत राहून त्यांना अंधारात ठेवून त्यांनी पक्षाचं नुकसान केलं. निवडणुका आल्या की, पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांना भेटा. मिलिंद नार्वेकरांना भेटण्याआधी कुणी थेट पुढे गेला तर त्याचं तिकीट कापलं गेलं म्हणून समजायचं, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुणी बोलत नाही. आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? बोललं तर संपला तो माणून, आमदार असेल तर तिकिट नाही, नगरसेवक असेल तर तिकिट नाही, अशी परिस्थिती होती, असा दावा रामदास कदम यांनी केला.

दरम्यान, मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही बोलायचं नाही आहे. मात्र महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे. मी आदित्य ठाकरेंना विचारतो की, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर त्य़ांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का, शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते का? असा रोखठोक प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMilind Narvekarमिलिंद नार्वेकर