शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणार; जितेंद्र आव्हाडांचे रुल बुकवरून राजकीय भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 19:22 IST

ज्यांना राजकारणात शरद पवार यांनी आणले त्यांनी पवारांच्या नैतिकतेवर बोलावे, हे कठीण आहे, असे आव्हाडांनी म्हटले.

निकाल तुमच्या बाजुने लागलाय आमचे काही म्हणणे नाही. सर्वोच्च न्यायालयाने पक्षातील फूट मान्य नाही असे का म्हटले. सर्वोच्च न्यायालय खूप गंभीर आहे. दिल्लीचा जो निकाल दिलाय, तेव्हा कोर्टाने सांगितलेले तात्काळ सुनावणी होईल. महाराष्ट्रातही शिंदे सरकार अपात्रतेचा मुद्दा एक वर्ष खेचतील असे काही होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

पत्रकारांनी आव्हाडांना सारा अली खानच्या केदारनाथ दौऱ्यावरही छेडले. तेव्हा आव्हाड म्हणाले की, सारा अली खानचं वय बघा, ती कोणत्या परिस्थितीत वाढलीय ते पहा. एखादा व्यक्ती जर जात असेल तर वैय़क्तीक स्तरावर जाण्याची गरज नाही. आमच्यामागे ट्रोल लागतात त्यांचा विचार केला तर रोज १०० गुन्हे दाखल होतील, त्यामुळे ट्रोलकडे लक्ष द्यायचे नाही, असे ते म्हणाले.

ज्यांना राजकारणात शरद पवार यांनी आणले त्यांनी पवारांच्या नैतिकतेवर बोलावे, हे कठीण आहे. कोर्टाने १४१ पानांची रुल बुक दिली आहे. त्यानुसार चालावे लागणार त्यामुळे जर तर अर्थ नाही. अपात्रतेचा अर्ज टाकला त्या दिवशीचा विचार करायचा हे स्पष्ट म्हटले आहे. तेव्हाचा राजकीय पक्ष शिवसेना होती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होते. न्यायालयानेच विधी मंडळ पक्ष महत्वाचा नाही असे म्हटले आहे, असे आव्हाड म्हणाले. 

व्हीप हा पक्षप्रमुख नेमतो. यानुसार सुनील प्रभूंचा व्हीप लागू होतो. यावर चर्चा करण्यात अर्थ नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुक लागणार आहेत. म्हणजे तो गेला आहे फक्त जाहीर करायचे माहित नाही, अशी त्यांची अवस्था असल्याची टीका आव्हाड यांनी केली. परमबीर सिंहांच्या निलंबनावर बोलताना इतका कर्तव्यदक्ष अधिकारी आहे त्यावर काय बोलायला लावता, असा टोला लगावला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे