शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणार; जितेंद्र आव्हाडांचे रुल बुकवरून राजकीय भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 19:22 IST

ज्यांना राजकारणात शरद पवार यांनी आणले त्यांनी पवारांच्या नैतिकतेवर बोलावे, हे कठीण आहे, असे आव्हाडांनी म्हटले.

निकाल तुमच्या बाजुने लागलाय आमचे काही म्हणणे नाही. सर्वोच्च न्यायालयाने पक्षातील फूट मान्य नाही असे का म्हटले. सर्वोच्च न्यायालय खूप गंभीर आहे. दिल्लीचा जो निकाल दिलाय, तेव्हा कोर्टाने सांगितलेले तात्काळ सुनावणी होईल. महाराष्ट्रातही शिंदे सरकार अपात्रतेचा मुद्दा एक वर्ष खेचतील असे काही होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

पत्रकारांनी आव्हाडांना सारा अली खानच्या केदारनाथ दौऱ्यावरही छेडले. तेव्हा आव्हाड म्हणाले की, सारा अली खानचं वय बघा, ती कोणत्या परिस्थितीत वाढलीय ते पहा. एखादा व्यक्ती जर जात असेल तर वैय़क्तीक स्तरावर जाण्याची गरज नाही. आमच्यामागे ट्रोल लागतात त्यांचा विचार केला तर रोज १०० गुन्हे दाखल होतील, त्यामुळे ट्रोलकडे लक्ष द्यायचे नाही, असे ते म्हणाले.

ज्यांना राजकारणात शरद पवार यांनी आणले त्यांनी पवारांच्या नैतिकतेवर बोलावे, हे कठीण आहे. कोर्टाने १४१ पानांची रुल बुक दिली आहे. त्यानुसार चालावे लागणार त्यामुळे जर तर अर्थ नाही. अपात्रतेचा अर्ज टाकला त्या दिवशीचा विचार करायचा हे स्पष्ट म्हटले आहे. तेव्हाचा राजकीय पक्ष शिवसेना होती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होते. न्यायालयानेच विधी मंडळ पक्ष महत्वाचा नाही असे म्हटले आहे, असे आव्हाड म्हणाले. 

व्हीप हा पक्षप्रमुख नेमतो. यानुसार सुनील प्रभूंचा व्हीप लागू होतो. यावर चर्चा करण्यात अर्थ नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुक लागणार आहेत. म्हणजे तो गेला आहे फक्त जाहीर करायचे माहित नाही, अशी त्यांची अवस्था असल्याची टीका आव्हाड यांनी केली. परमबीर सिंहांच्या निलंबनावर बोलताना इतका कर्तव्यदक्ष अधिकारी आहे त्यावर काय बोलायला लावता, असा टोला लगावला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे