शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा लवकरच ठरणार? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 2:03 PM

कोरोनाचे सावट असल्यामुळे संमेलनाबाबत अद्यापही नाही ठोस निर्णय..

ठळक मुद्देशासनाकडून संमेलनासाठी मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान देखील अद्याप नाही

पुणे : यंदाच्या साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असल्यामुळे आगामी वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत अद्यापही कोणताच ठोस निर्णय साहित्य महामंडळाकडून घेण्यात आलेला नाही. मात्र आता त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. साहित्य महामंडळाने सर्व घटक, संलग्न व समाविष्ट संस्थांची येत्या 3 जानेवारीला औरंगाबाद येथे बैठक बोलावली आहे. सर्व सदस्यांनी संमेलन आयोजनासाठी होकार दर्शविल्यानंतर स्थळ निवड समिती, संमेलन नियोजन समितीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. बदललेल्या परिस्थितीत आयोजनाची तयारी कशी असेल, यावर निर्णय ठरेल. 

साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनासाठी नाशिक, अंमळनेर आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीकरिता अशा तीन ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत. वर्धा येथून निमंत्रण येण्याची शक्यता आहे. एप्रिल २०१५ मध्ये पंजाबमधील घुमान येथे संमेलन आयोजित करण्याचा मान सरहद संस्थेला देण्यात आला होता.  जानेवारीमध्ये उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनावेळी नाशिक आणि अंमळनेर येथून पुढील संमेलनासाठी निमंत्रणे आली होती.त्या निमंत्रणावर बैठकीत चर्चा होणार आहे.  मात्र  करोनामुळे परिस्थिती बदलल्याने या दोन शहरातील संस्थांची आर्थिक तयारी आहे का, याचा विचार केला जाणार आहे. याउलट सरहदने ऐन करोनाकाळात महामंडळाला प्रस्ताव पाठवून आगामी संमेलन दिल्लीत घेण्याची विनंती केली आहे. मात्र महामंडळाने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. करोनामुळे हे वर्ष आर्थिक संकटातून जात असताना संमेलनासाठी निमंत्रण देणार्‍या संस्था आयोजनाबाबत पुर्नविचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, स्थळ निश्चित नसल्याने महामंडळाला शासनाकडून संमेलनासाठी मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान देखील अद्याप मिळू शकलेले नाही. शासनाकडून महामंडळाला सातत्याने विचारणा होत आहे. मात्र महामंडळाने अद्याप शासनाला संमेलनाबाबत ठोस कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे या बैठकीकडे  मराठी बांधवांचे लक्ष लागले आहे.....संमेलनासंदर्भातील बैठकीसाठी सदस्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. संस्था आयोजनाला तयार आहेत का? संमेलन कशा पद्धतीने करायचे? निधी उपलब्ध होईल का? असे सगळे प्रश्न आहेत. संमेलनाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा विचार केला जाईल- -प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष साहित्य महामंडळ.....

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळmarathiमराठीcorona virusकोरोना वायरस बातम्या