शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या डॉक्टरांना जेनेरिकची ‘अ‍ॅलर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 22:59 IST

सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी आॅक्टोबर 2015 पासून देशभरात केंद्र सरकार पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार

सुमेध वाघमारे / ऑनलाइन लोकमत

नागपूर,दि.18- सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी आॅक्टोबर 2015 पासून देशभरात केंद्र सरकार पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार असल्याची घोषणा झाली. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांना जेनेरिक औषधे लिहून देणे बंधनकारक करण्यासाठी केंद्र सरकार कायदा करेल, असे प्रतिपादन केले. परंतु वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) अधिपत्याखाली येणाºया राज्यातील सर्व मेडिकलचे डॉक्टर जेनेरिक औषधांची ‘अ‍ॅलर्जी’ असल्यासारखे वागतात. मेडिकलच्या ‘प्रिस्क्रिप्शन’वर महागडी ‘ब्रॅण्डेड’ औषधे लिहून देण्याचा धडाका आजही सुरूच आहे.
१९७७ मध्ये नेमलेल्या हाथी समितीने ११७ जेनेरिक औषधे उपलब्ध ठेवा आणि ब्रॅण्डेड औषधे रद्द करा, अशी शिफारस केली होती.  मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने २००२ च्या नियमानुसार डॉक्टरांनी शक्यतो जेनेरिक औषधेच रुग्णांना लिहून देण्याच्या सूचना केल्या आहेेत, तर दोन वर्षांपूर्वी देशभरात पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार असल्याची घोषणा केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली होती. परंतु या सर्वांचा प्रभाव अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या (मेडिकल) डॉक्टरांवर पडलेला नसल्याचे दिसून येते. आधीच अडचणीत असलेल्या गरीब रुग्णांना अनावश्यक महागडी औषधे लिहून देऊन त्यांचे कंबरडे मोडण्याचे काम होत असल्याचे वास्तव आहे. 
शासकीय रुग्णालयांत ‘एमआर’ची गर्दी-
शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांनी जेनेरिक औषधेच लिहून देण्याचा नियम असताना मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात विविध औषधे कंपन्यांच्या वैद्यकीय प्रतिनिधींची (एमआर) गर्दी बरेच काही सांगून जाते.  आपल्याच कंपन्यांची औषधे लिहून देण्यासाठी काही कंपन्यांचे ‘एमआर’ गिफ्ट कूपन, भेटवस्तू, ‘टूर पॅकेज’चे आमिष देत असल्याचे प्रकार सर्रास चालतात. परिणामी, ‘प्रिस्क्रिप्शन’वर जेनेरिक औषधांऐवजी ‘ब्रॅण्डेड’ औषधे लिहिली जात आहे.
जेनेरिक औषधेच का?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार जेनेरिक औषधी गुणवत्तेच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च ससंबंधित कंपनीने आधीच वसूल केलेला असतो. त्यामुळे केवळ औषधनिर्मितीच्या उत्पादन खर्चानुसार त्यांची किंमत ठरवली जात असल्याने ही किंमत मूळ ब्रॅण्डेड औषधांपेक्षा खूप कमी होते. असे असतानाही देशात ‘ब्रॅण्डेड’ नावाने अधिक किमतीत याच औषधे विकली जातात. या ‘ब्रॅण्डेड’ औषधांमुळे रुग्णांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे.
‘डीएमईआर’ने कारवाई करायला हवी-
जे शासकीय डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देत नाही त्यांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने केली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. औषध कंपन्या व डॉक्टरांमधील साटेलोट्यामुळे गरीब रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध होत नाहीत. हे थांबण्यासाठी ‘डीएमईआर’ने पुढाकार घेऊन अशा डॉक्टरांवर कारवाई करायला हवी. सरकारनेही कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. -अ‍ॅड. अनिल किलोर, अध्यक्ष, जनमंच
जून महिन्यापासून जेनेरिक औषधे-
 मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात येणाºया रुग्णांसाठी जून महिन्यापासून जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. मेडिकलच्या डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधेच लिहून द्यावी, अशा सूचना वेळोवेळी दिल्या जातात. -डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल .