शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

मविआचा महामोर्चा: ठाकरे कुटुंब पहिल्यांदाच रस्त्यावर; राज्यपालांविरोधात विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 06:36 IST

राज्यपालांना हटवले नाही तर  महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई, बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षांविरोधात आगपाखड केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. मुंबईतील रिचर्डसन ॲण्ड क्रुडास कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत महामोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 

राज्यपालांना हटवले नाही तर  महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई, बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षांविरोधात आगपाखड केली. 

हा महामोर्चा काढून विरोधी पक्षांनी एकजूट दाखविण्याचा प्रयत्न केला. आघाडीतील तिन्ही पक्षांसह सीपीआयएम, समाजवादी पार्टी, शेकापनेही मोर्चाला पाठिंबा दिल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यात महाविकास आघाडीला यश आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा  दुपारी १ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ पोहोचला. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

सीमावादावरही आक्रमक भूमिकाया मोर्चामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यांनी अखंड महाराष्ट्राचे फलक झळकावत बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. नेत्यांनीही भाषणातूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध नोंदवला.

संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागीउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हेच आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनांत सहभागी झाले होतेे. पण महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये पूर्ण ठाकरे कुटुंबच रस्त्यावर उतरले.  पहिल्यांदाच रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे अशा मोठ्या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 

पोलिस व आंदोलकांत अनेकदा बाचाबाचीजे. जे. फ्लायओव्हरवरून मोर्चाचे मार्गक्रमण झाले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना हटकणारे पोलिस आणि आंदोलक यांच्यात अनेकदा बाचाबाची झाली. ती रोखण्यासाठी व्यासपीठावरून नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना करावी लागली.     

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना