शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मविआचा महामोर्चा: ठाकरे कुटुंब पहिल्यांदाच रस्त्यावर; राज्यपालांविरोधात विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 06:36 IST

राज्यपालांना हटवले नाही तर  महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई, बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षांविरोधात आगपाखड केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. मुंबईतील रिचर्डसन ॲण्ड क्रुडास कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत महामोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 

राज्यपालांना हटवले नाही तर  महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई, बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षांविरोधात आगपाखड केली. 

हा महामोर्चा काढून विरोधी पक्षांनी एकजूट दाखविण्याचा प्रयत्न केला. आघाडीतील तिन्ही पक्षांसह सीपीआयएम, समाजवादी पार्टी, शेकापनेही मोर्चाला पाठिंबा दिल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यात महाविकास आघाडीला यश आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा  दुपारी १ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ पोहोचला. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

सीमावादावरही आक्रमक भूमिकाया मोर्चामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यांनी अखंड महाराष्ट्राचे फलक झळकावत बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. नेत्यांनीही भाषणातूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध नोंदवला.

संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागीउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हेच आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनांत सहभागी झाले होतेे. पण महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये पूर्ण ठाकरे कुटुंबच रस्त्यावर उतरले.  पहिल्यांदाच रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे अशा मोठ्या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 

पोलिस व आंदोलकांत अनेकदा बाचाबाचीजे. जे. फ्लायओव्हरवरून मोर्चाचे मार्गक्रमण झाले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना हटकणारे पोलिस आणि आंदोलक यांच्यात अनेकदा बाचाबाची झाली. ती रोखण्यासाठी व्यासपीठावरून नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना करावी लागली.     

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना