शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मविआची गाडी चार जागांवर अडकली; शिवसेनेला हवे जालना, शिर्डी, रामटेक; शरद पवारांना हवे वर्धा; आज मुंबईत पुन्हा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 06:36 IST

आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे. 

आदेश रावल -

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने  समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासोबत हातमिळवणी केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्रातील आघाडीच्या जागावाटपावर. महाविकास आघाडीच्या अनेक बैठका दिल्ली ते मुंबईपर्यंत पार पडल्या आहेत; पण, अद्याप याबाबत घोषणा झालेली नाही. जागावाटपाची चर्चा चार जागांवर अडल्याचे सांगितले जात आहे. त्यात जालना, शिर्डी (राखीव), वर्धा आणि रामटेक या चार जागांचा समावेश आहे.

आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे. 

दरम्यान, काँग्रेसकडून लढविल्या जाणाऱ्या जागांसदर्भात चर्चा करण्यासाठी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल गुरुवारी मुंबईत पोहोचणार आहे. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतील आणि या चार जागांवर चर्चा करतील. 

दुसरीकडे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आजच (गुरुवारी) होणार आहे. यात जवळपास १२ राज्यांतील लोकसभेच्या जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. या जागांवर गुरुवारी निर्णय झाला नाही, तर पुन्हा हा मुद्दा काँग्रेसच्या पाच सदस्यीय समितीसमोर मांडला जाईल. त्यानंतर ही समिती या विषयावर चर्चा करेल. त्या चर्चेनंतर या १२ राज्यांतील जागावाटपाचा निर्णय होणार असल्याचे समजते. 

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक