शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठवाडा वॉटरग्रीड योजना रद्द नाही; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 09:47 IST

तुटीच्या धरणातील पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येईल यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंका उपस्थित केलेली मराठवाडा वॉटरग्रीड योजना अद्याप रद्द झाली नसल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकामंत्री आणि मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण यांनी दिले. मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर चव्हाण यांनी ही माहिती दिली. 

मराठवाडा वॉटरग्रीड योजनेचा पिण्याच्या पाण्यासाठी कसा उपयोग होईल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. मराठवाड्यातील 11 पैकी निम्मी धरणे तुटीची आहेत. या तुटीच्या धरणातील पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येईल यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 

कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी जायकवाडी प्रकल्पात वळविण्यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा केल्याचे ते म्हणाले. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यात बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी या योजनेत तांत्रिक त्रुटी असल्याचे म्हटले होते. मात्र योजनेसंदर्भातील अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

मराठवाडा वॉटरग्रीड योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आणण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावरून विरोधकांनी टीका केली होती. तर माजी पाणीपुरवठामंत्री आणि भाजपनेते बबनराव लोणीकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.