शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मराठवाडा वॉटरग्रीड योजना रद्द नाही; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 09:47 IST

तुटीच्या धरणातील पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येईल यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंका उपस्थित केलेली मराठवाडा वॉटरग्रीड योजना अद्याप रद्द झाली नसल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकामंत्री आणि मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण यांनी दिले. मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर चव्हाण यांनी ही माहिती दिली. 

मराठवाडा वॉटरग्रीड योजनेचा पिण्याच्या पाण्यासाठी कसा उपयोग होईल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. मराठवाड्यातील 11 पैकी निम्मी धरणे तुटीची आहेत. या तुटीच्या धरणातील पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येईल यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 

कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी जायकवाडी प्रकल्पात वळविण्यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा केल्याचे ते म्हणाले. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यात बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी या योजनेत तांत्रिक त्रुटी असल्याचे म्हटले होते. मात्र योजनेसंदर्भातील अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

मराठवाडा वॉटरग्रीड योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आणण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावरून विरोधकांनी टीका केली होती. तर माजी पाणीपुरवठामंत्री आणि भाजपनेते बबनराव लोणीकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.