शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Marathi Sahitya Sammelan: कूस बदलायची वेळ..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:29 IST

Marathi Sahitya Sammelan: ​​​​​​​जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्याची गरज आहे. 

- दीपक करंजीकर(अभिनेता व अर्थतज्ज्ञ) उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर, यंत्रभूमी, मंत्रभूमी, तंत्रभूमी अशी वर्षानुवर्ष ओळख असलेल्या नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. कुसुमाग्रज नगरी असे संमेलन स्थळाला नाव देण्यात आले आहे. संमेलन ज्या टाईमलाईनवर होत आहे तो फार महत्त्वाचा आहे. जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे. आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्याची गरज आहे. नवीन शतकातील २० वर्ष उलटून गेली आहेत. या वर्षात तंत्रज्ञानाचा जो वेग बघितला तर, तो त्याआधीच्या पन्नास वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. इतके झपाट्याने सर्व बदलत आहे. साहित्य हे समाज मनाचे प्रतिबिंब असते. खरं तर, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभतो, ही फार मोठी गोष्ट आहे. कूस बदलायची म्हणजे काय करायचे. तर, त्याला अनेक आयाम आहे. विज्ञानाने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय केले. तर, आपली जीवनशैली, विचार पद्धती, संवाद पद्धती बदलली. काही भागात आपलं अवलंबित्व वाढवलं तर, काही भागात कमी केले. विज्ञानाने आपल्याला जिज्ञासू वृत्ती दिली. या जगातील प्रत्येक गोष्ट शास्त्र काट्याच्या कसोटीवर ताणून पाहायची असते आणि ती वारंवार घडत असेल तर, ते वैज्ञानिक सत्य मानायचे असते, असा दृष्टिकोन विज्ञानाने दिला.  नाशिकमधील साहित्यिकांनी अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्यासोबत बैठक घेऊन काही लोकांना विज्ञान कथेचा वारसा कसा सोपवता येईल यावर विचार करायला हवा.  विज्ञानातील काही शोध हे एखाद्या कल्पितापेक्षाही अद्भूत असू शकतात. याची ओळख करून देणारे अनेक लेखक मराठीत आहेत. पण कुतूहलाचे विषय वेगळे असतील अशा तरुणांनी त्यांच्यापेक्षा तरुण असलेल्या पिढीकरिता विज्ञानाची महती पोहोचवणाऱ्या कथा लिहिण्याकरिता काही येईल का, याचा विचार व्हावा.        

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक