शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Marathi Sahitya Sammelan: कूस बदलायची वेळ..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:29 IST

Marathi Sahitya Sammelan: ​​​​​​​जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्याची गरज आहे. 

- दीपक करंजीकर(अभिनेता व अर्थतज्ज्ञ) उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर, यंत्रभूमी, मंत्रभूमी, तंत्रभूमी अशी वर्षानुवर्ष ओळख असलेल्या नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. कुसुमाग्रज नगरी असे संमेलन स्थळाला नाव देण्यात आले आहे. संमेलन ज्या टाईमलाईनवर होत आहे तो फार महत्त्वाचा आहे. जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे. आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्याची गरज आहे. नवीन शतकातील २० वर्ष उलटून गेली आहेत. या वर्षात तंत्रज्ञानाचा जो वेग बघितला तर, तो त्याआधीच्या पन्नास वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. इतके झपाट्याने सर्व बदलत आहे. साहित्य हे समाज मनाचे प्रतिबिंब असते. खरं तर, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभतो, ही फार मोठी गोष्ट आहे. कूस बदलायची म्हणजे काय करायचे. तर, त्याला अनेक आयाम आहे. विज्ञानाने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय केले. तर, आपली जीवनशैली, विचार पद्धती, संवाद पद्धती बदलली. काही भागात आपलं अवलंबित्व वाढवलं तर, काही भागात कमी केले. विज्ञानाने आपल्याला जिज्ञासू वृत्ती दिली. या जगातील प्रत्येक गोष्ट शास्त्र काट्याच्या कसोटीवर ताणून पाहायची असते आणि ती वारंवार घडत असेल तर, ते वैज्ञानिक सत्य मानायचे असते, असा दृष्टिकोन विज्ञानाने दिला.  नाशिकमधील साहित्यिकांनी अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्यासोबत बैठक घेऊन काही लोकांना विज्ञान कथेचा वारसा कसा सोपवता येईल यावर विचार करायला हवा.  विज्ञानातील काही शोध हे एखाद्या कल्पितापेक्षाही अद्भूत असू शकतात. याची ओळख करून देणारे अनेक लेखक मराठीत आहेत. पण कुतूहलाचे विषय वेगळे असतील अशा तरुणांनी त्यांच्यापेक्षा तरुण असलेल्या पिढीकरिता विज्ञानाची महती पोहोचवणाऱ्या कथा लिहिण्याकरिता काही येईल का, याचा विचार व्हावा.        

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक