शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मराठी भाषा दिन: सोप्या मराठीच्या वाटेत महामंडळाची आडकाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:05 IST

एक तप सुरू आहेत प्रयत्न; साहित्य महामंडळाच्या दप्तरात अहवाल धूळखात पडून

- रवींद्र मांजरेकर मुंबई : शुद्धलेखनाच्या १८ नियमांनी अवघडलेल्या मराठी भाषेला मोकळी करण्याचा प्रयत्न १२ वर्षे सुरू आहे. त्या नियमांबाबत चर्चेअंती तयार झालेले दोन अहवाल मराठी भाषकांच्या मतदानासासाठी देण्याची सवड चार वर्षांत मराठी साहित्य महामंडळाला झाली नाही. आता मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अहवालांवरील धूळ झटकली जाईल का, असा अभ्यासकांचा प्रश्न आहे.महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कारित केलेल्या मराठी लेखनविषयक १४ नियमांना १९६२ मध्ये मान्यता देण्यात आली. पुढे १९७२ मध्ये महामंडळाने आणखी चार नियमांची भर घातली. या नियमांवर संस्कृतचा प्रभाव आहे. मराठीत आलेल्या संस्कृत शब्दांना संस्कृतचेच नियम लावण्यात येतात. त्यामुळे मराठी शुद्धलेखनाचे नियम अवघड झाले आहेत. संस्कृतचे शब्द ओळखता येत नाहीत, ही अडचण भाषेच्या अभ्यासकांच्या लक्षात आली. त्यातून मार्ग काढण्यासाठी २००८ पासून प्रयत्न सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून २००८ ते २०१० या काळात महामंडळातर्फे मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपुरात चर्चासत्रे झाली. अभ्यासकांची मते घेतली. त्यावर विचार करण्यासाठी २०१४ मध्ये सात जणांची समिती नेमण्यात आली. डिसेंबर-२०१४ ते मार्च-२०१५ या काळात या समितीच्या सभा झाल्या.या समितीमध्ये मराठीप्रेमी आणि संस्कृतप्रेमी असे दोन गट पडले. संस्कृतसह कोणत्याही परभाषेतून आलेले शब्द हे मराठीच्या नियमाप्रमाणे चालतील, असा मुख्य बदल शुद्धलेखनाच्या नियमांत करावा. त्यामुळे मराठीचा वापर सोपा होईल आणि क्लिष्टता निघून जाईल, असा एक मतप्रवाह आहे. संस्कृतचे वेगळेपण सोडणे म्हणजे भाषेपासून दूर जाणे, असा दुसरा मतप्रवाह आहे. या मतप्रवाहांत एकवाक्यता न झाल्याने शुद्धलेखनाच्या सोप्या नियमांविषयी काहीच निर्णय झाला नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले.शेवटच्या दिवशी प्रस्ताव देण्यासाठी अगदीच थोडा वेळ शिल्लक राहिल्याने प्रस्ताव नीट मांडता आलेले नाहीत. त्यामुळे आमच्याकडून सविस्तर प्रस्ताव मागवावेत आणि ते मराठी जनतेसमोर जावेत, अशी मागणी समितीचे एक सदस्य अरुण फडके यांनी केली आहे.संकेतस्थळावर टाका दोन्ही प्रस्तावतोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंचे प्रस्ताव मराठी जनांच्या अभ्यासासाठी महामंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावेत, असे ठरले होते. त्यालाही आता चार वर्षे उलटून गेली, तरीही या प्रस्तावावरील धूळ झटकण्यास महामंडळ तयार नाही. मराठीच्या अभ्यासकांनी शुद्धलेखनाचा विचार करावा, असे आपले मत असल्याचे ठाले-पाटील म्हणाले.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिन