शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

मराठवाड्याची तहान अखेर भागणार; जायकवाडीसाठी पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:09 IST

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले.

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले. निळवंडे धरणातून सकाळी 8.40 वाजता जायकवाडीसाठी 4250 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. तर मुळा धरणातून सहा हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात आले. 

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला नगर, नाशिक जिल्ह्यांतून विरोध होत होता. प्रसंगी जलसमाधी घेण्याचा इशारा काही नेत्यांनी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर 9 टीएमसी पाणी जायकवाडीला मिळणार आहे. 

मुळा धरणातून जायकवाडीसाठी आज सकाळी नऊ वाजता सहा हजार क्युसेक्सकने 11 दरवाज्यातून ( मो-या) पाणी सोडण्यात आले. दुपारी दोन वाजता आठ हजार तर रात्री बारा वाजता  12 हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्यापूर्वी तीन वेळा भोंगा वाजवून सावधानतेचा इशारा देण्यात आला. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी कळ दाबून नदी पात्रात पाणी सोडले. जायकवाडीसाठी तीन दिवसात 1 हजार 9 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे.  धरणाची साठवण क्षमता 26 हजार दलघफू आहे. 

निळवंडेतून जायकवाडीला 4250 क्युसेकने 5 मोऱ्यांमधून पाणी सोडण्यात आले. दर दोन तासांनी यामध्ये वाढ केली जाणार आहे. 

 

जायकवाडीसाठी नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता 3500 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाNashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई