शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 18:18 IST

आंदोलन करून वेठीस धरणे आमचा उद्देश नाही, आम्ही सरकारला संधी दिलीय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जालना – सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ लागणार असेल तर एका दिवसात अध्यादेश, जीआर काढता येईल. इतके पुरावे आम्ही द्यायला तयार आहोत. सरकारने यावे पुरावे देतो. मराठवाड्यातील मराठा कुणबी असल्याचे कागदपत्रे आहेत. सरकारचा ४ दिवसांचा वेळ वाया जाऊ नये त्यामुळे आम्ही पुरावे द्यायला तयार आहोत. सरकारने यावे आणि पुरावे घेऊन जावेत. एक दिवसात अध्यादेश निघेल एवढे कायदेशीर पुरावे द्यायला तयार आहोत असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारची इच्छाशक्ती असली तरी एका कागदावरही अध्यादेश देऊ शकते. आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. विधानसभा नसली तरी आम्ही जी कागदे देतोय त्याआधारे राज्यपालांच्या आदेशाने वटहुकूम काढू शकता. सरकारने १ महिना असो ४ दिवसांची वेळ वाया घालवू नका. आम्ही तज्ज्ञ द्यायला तयार आहोत, पुरावे द्यायला तयार आहोत. राज्यातील जनतेला आवाहन आहे आपण पुरावे द्यायला तयार आहोत. राज्य सरकारला कायदा बनवायचा अधिकार आहे. आमचे आमंत्रण स्वीकारा आणि मराठा समाजाचे कल्याण करा असं आवाहन मनोज जरांगेंनी म्हटलं.

तसेच आंदोलन करून वेठीस धरणे आमचा उद्देश नाही, आम्ही सरकारला संधी दिलीय. एखादा कायदा बनवण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती द्यायला तयार आहोत. आम्ही सरकारचा वेळ वाचवतोय, तुम्हाला कारण ठेवायला जागा ठेवत नाही. आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. आंदोलन लांबवायचे नाही. तुम्हालाही आंदोलन चिरडायचे नाही, मराठा आरक्षण द्यायचे असेल तर कायद्याच्या चौकटीतले आरक्षण लवकर द्यावे असं मनोज जरांगेंनी सांगितले.

दरम्यान, तुम्ही महिन्याची मुदत मागताय, तुम्ही महिनाभर जो डेटा जमा करणार तो आम्ही तुम्हाला देतो. तुमचा महिनाभर वेळ वाया जाणार नाही. सगळे कागदपत्रे, पुरावे आम्ही देतो, सरकारला पळण्याची गरज नाही. सरकारची अडचण समजून घेणारे आम्ही कोणी नाही, सरकारने जनतेची अडचण समजून घ्यायची आहे. आम्ही मागणी करून पुरावे देतोय, त्यामुळे सरकारच मराठा आंदोलनाला वेठीस धरतंय अशी दाट शक्यता आहे. हे आंदोलन राजकारण्यांनी केले नाही. पूर्वीपासून आम्हाला ओबीसीमधून आरक्षण आहे, ओबीसीच्या ८३ व्या क्रमांकावर कुणबी मराठा आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी समन्वयाने घ्यावे. वरचे आपले चांगले होऊ देणार नाही. एकमेकांच्या समन्वयाने पुढे जाऊ. सामान्य ओबीसी, सामान्य मराठा एकत्र येऊन मोठे आंदोलन करू. एकमेकांच्या अंगावर घालायचे काम हे लोकं करतायेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण