शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 18:18 IST

आंदोलन करून वेठीस धरणे आमचा उद्देश नाही, आम्ही सरकारला संधी दिलीय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जालना – सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ लागणार असेल तर एका दिवसात अध्यादेश, जीआर काढता येईल. इतके पुरावे आम्ही द्यायला तयार आहोत. सरकारने यावे पुरावे देतो. मराठवाड्यातील मराठा कुणबी असल्याचे कागदपत्रे आहेत. सरकारचा ४ दिवसांचा वेळ वाया जाऊ नये त्यामुळे आम्ही पुरावे द्यायला तयार आहोत. सरकारने यावे आणि पुरावे घेऊन जावेत. एक दिवसात अध्यादेश निघेल एवढे कायदेशीर पुरावे द्यायला तयार आहोत असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारची इच्छाशक्ती असली तरी एका कागदावरही अध्यादेश देऊ शकते. आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. विधानसभा नसली तरी आम्ही जी कागदे देतोय त्याआधारे राज्यपालांच्या आदेशाने वटहुकूम काढू शकता. सरकारने १ महिना असो ४ दिवसांची वेळ वाया घालवू नका. आम्ही तज्ज्ञ द्यायला तयार आहोत, पुरावे द्यायला तयार आहोत. राज्यातील जनतेला आवाहन आहे आपण पुरावे द्यायला तयार आहोत. राज्य सरकारला कायदा बनवायचा अधिकार आहे. आमचे आमंत्रण स्वीकारा आणि मराठा समाजाचे कल्याण करा असं आवाहन मनोज जरांगेंनी म्हटलं.

तसेच आंदोलन करून वेठीस धरणे आमचा उद्देश नाही, आम्ही सरकारला संधी दिलीय. एखादा कायदा बनवण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती द्यायला तयार आहोत. आम्ही सरकारचा वेळ वाचवतोय, तुम्हाला कारण ठेवायला जागा ठेवत नाही. आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. आंदोलन लांबवायचे नाही. तुम्हालाही आंदोलन चिरडायचे नाही, मराठा आरक्षण द्यायचे असेल तर कायद्याच्या चौकटीतले आरक्षण लवकर द्यावे असं मनोज जरांगेंनी सांगितले.

दरम्यान, तुम्ही महिन्याची मुदत मागताय, तुम्ही महिनाभर जो डेटा जमा करणार तो आम्ही तुम्हाला देतो. तुमचा महिनाभर वेळ वाया जाणार नाही. सगळे कागदपत्रे, पुरावे आम्ही देतो, सरकारला पळण्याची गरज नाही. सरकारची अडचण समजून घेणारे आम्ही कोणी नाही, सरकारने जनतेची अडचण समजून घ्यायची आहे. आम्ही मागणी करून पुरावे देतोय, त्यामुळे सरकारच मराठा आंदोलनाला वेठीस धरतंय अशी दाट शक्यता आहे. हे आंदोलन राजकारण्यांनी केले नाही. पूर्वीपासून आम्हाला ओबीसीमधून आरक्षण आहे, ओबीसीच्या ८३ व्या क्रमांकावर कुणबी मराठा आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी समन्वयाने घ्यावे. वरचे आपले चांगले होऊ देणार नाही. एकमेकांच्या समन्वयाने पुढे जाऊ. सामान्य ओबीसी, सामान्य मराठा एकत्र येऊन मोठे आंदोलन करू. एकमेकांच्या अंगावर घालायचे काम हे लोकं करतायेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण