शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 13:14 IST

Maratha Reservation : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे.

औरंगाबाद - छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मांडले आहे. तसेच मराठा आरक्षणावर बोलू नका, असा फोन बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून मला आला आहे. माझ्याच पक्षाकडून माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी क्रांतीचौक येथील ठिय्या आंदोलनात पत्रकार परिषदेत बोलताना केला. जाधव म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठल्याही राजकीय पक्षाला रस नाही. आपल्याला फक्त फिरविले जात आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर बसण्याची गरज आहे, तशी भूमिका कुठलाही पक्ष घेण्यास तयार नाही. माणसे मरत असताना माझा पक्ष मला म्हणतो, आरक्षणाबाबत बोलायचे नाही. याला तोडगा एकच आहे, आपले छत्रपती शासन आणणे. मराठा बांधवांनी यावर विचार करावा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करणे गरज असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. आपली माणसे निवडून आणावी लागतील. "विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊनच अध्यादेश काढता येईल. त्याला तीन महिने लागतील. दोन वर्षांपासून समाजाचे मोर्चे निघत असताना आता तीन महिने कशासाठी लागत आहेत. याचा अर्थ असा आहे की, आरक्षण द्यायचे नाही. वेळकाढू धोरण सरकार राबवीत आहे. मराठा युवक नैराश्यात येत आहेत. समाजाने नैराश्यात जाण्याऐवजी स्वतंत्र राजकीय पक्ष काढून लढले पाहिजे." असा सल्ला जाधव यांनी दिला. पक्षप्रमुखांनीही फोन घेतला नाहीशिवसेनेचे गटनेते तथा मंत्री शिंदे यांनी फोन करून आरक्षणावर न बोलण्याची ताकीद दिली, ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली काय, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पक्षप्रमुखांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. त्यांची भेटही झाली नाही. मुख्यमंत्र्यांकडूनही काही दाद मिळाली नसल्याचे आ.जाधव म्हणाले. त्यांच्या विधानामुळे शिवसेनेची मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आ.जाधव म्हणाले, छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाvidhan sabhaविधानसभा