शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 13:14 IST

Maratha Reservation : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे.

औरंगाबाद - छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मांडले आहे. तसेच मराठा आरक्षणावर बोलू नका, असा फोन बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून मला आला आहे. माझ्याच पक्षाकडून माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी क्रांतीचौक येथील ठिय्या आंदोलनात पत्रकार परिषदेत बोलताना केला. जाधव म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठल्याही राजकीय पक्षाला रस नाही. आपल्याला फक्त फिरविले जात आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर बसण्याची गरज आहे, तशी भूमिका कुठलाही पक्ष घेण्यास तयार नाही. माणसे मरत असताना माझा पक्ष मला म्हणतो, आरक्षणाबाबत बोलायचे नाही. याला तोडगा एकच आहे, आपले छत्रपती शासन आणणे. मराठा बांधवांनी यावर विचार करावा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करणे गरज असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. आपली माणसे निवडून आणावी लागतील. "विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊनच अध्यादेश काढता येईल. त्याला तीन महिने लागतील. दोन वर्षांपासून समाजाचे मोर्चे निघत असताना आता तीन महिने कशासाठी लागत आहेत. याचा अर्थ असा आहे की, आरक्षण द्यायचे नाही. वेळकाढू धोरण सरकार राबवीत आहे. मराठा युवक नैराश्यात येत आहेत. समाजाने नैराश्यात जाण्याऐवजी स्वतंत्र राजकीय पक्ष काढून लढले पाहिजे." असा सल्ला जाधव यांनी दिला. पक्षप्रमुखांनीही फोन घेतला नाहीशिवसेनेचे गटनेते तथा मंत्री शिंदे यांनी फोन करून आरक्षणावर न बोलण्याची ताकीद दिली, ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली काय, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पक्षप्रमुखांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. त्यांची भेटही झाली नाही. मुख्यमंत्र्यांकडूनही काही दाद मिळाली नसल्याचे आ.जाधव म्हणाले. त्यांच्या विधानामुळे शिवसेनेची मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आ.जाधव म्हणाले, छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाvidhan sabhaविधानसभा