शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ओबीसी आरक्षण आणि ‘सगेसोयरें’बाबत जरांगे पाटील ठाम, उद्या आंदोलनाची घोषणा, सरकारने दिलेल्या आरक्षणाबाबत म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 2:40 PM

Maratha Reservation : आज मराठा समाजाला घोषित करण्यात आलेल्या आरक्षणाचं स्वागत करतानाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीवर ठाम असल्याचे म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मांडलेला ठराव एकमताने संमत झाला आहे. या ठवानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये १० टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र मराठा समाजाला देण्यात आलेल्या या आरक्षणाचं स्वागत करतानाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीवर ठाम असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी उद्या आंदोलनाची घोषणा करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विधिमंडळात मांडलेला प्रस्ताव एकमताने पारित झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, या आरक्षणाचं आम्ही आधीही स्वागत केलं होतं. आताही शंभर दिडशे जणांना लाभ होणाऱ्या या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो. मात्र हक्काचं ओबीसी आरक्षण मिळावं ही ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशा आमच्या कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या मराठा समाजाची मागणी आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरेंची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे.  आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्ही मिळवणारच. त्यासाठी आम्ही उद्या आंदोलनाची घोषणाही करणार आहोत, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने दिलेले हे आरक्षण टिकेल का यााबबत शंका आहे. हे आरक्षण राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आऱक्षण आहे. ते राज्यापासून केंद्रापर्यंत लागू होणारं आहे. आमची मुलं तिथं मोठी होतील. आज पारित झालेल्या या आरक्षणाची मागणी ही  दोघा तिघांची होती. त्यातून शंभर दीडशे जणांना फायदा होईल. मात्र त्याबाबत आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे. पण त्यातून गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचं कल्याण होणार नाही. त्यामुळे आमचं हक्काचं असलेलं आरक्षण आम्हाला ओबीसी कोट्यामधून  द्यावं. तसेच ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही त्यांच्यासाठी सगेसोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी हवी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असे जरांगे पाटील यांनी आज ठामपणे सांगितले.  

यावेळी सगेसोयरेंच्या अध्यादेशाबाबत संयम बाळगा, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे म्हणून तर आम्ही सरकारला सहा महिन्यांचा वेळ दिला होता. मात्र प्रत्येक वेळी माणूस भावनिक होऊन आपल्या जातीच्या लेकराचं वाटोळं करून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांना सरकार म्हणून जशा मर्यादा आहेत. तसेच आम्हालाही काही मर्यादा आहे. तुमच्या आश्वासनानं आमच्या मुलांचं पोट भरणार नाही. आमची मुलं २०-२५ वर्षे शिकतात. पण त्यांचं भविष्य घडण्याच्या वेळी त्यांची संधी हिरावली जाते. त्यामुळे आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. ते कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा. तसेच सगेसोयरेबाबत आलेल्या हरकतीचं तुम्हाला काय करायचं आहे तो आमचा प्रश्न नाही तो सरकारचा आहे.  हरकतींचा विषय पुढे करून एवढ्य मोठ्या समाजाचा अपमान करायचा ही सरकारची भूमिका योग्य नाही ,असेही जरांगे पाटील यांनी सुनावले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेOBC Reservationओबीसी आरक्षण