शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

"जालन्यातील घटनेनंतर पोलीस हतबल, सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास देणं गरजेचे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:20 IST

अंतरवाली सराटी इथं पोलिसांवर अमानुषपणे दगडफेक झाली. ७० पोलीस रुग्णालयात दाखल झाले. हिंमत असेल तर महिला पोलिसांना विचारा असं भुजबळ म्हणाले.

पुणे - जालनात पोलिसांवर हल्ले झाले, महिला पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या मग आमचे काय घेऊन बसलात? पोलीस हतबल झाल्यासारखे वाटतात. पोलीस जखमी झाल्यानंतरही काही कारवाई नाही. पोलिसांना सध्या विश्वास देणे गरजेचे आहे. सरकार पोलिसांच्या पाठिशी आहे असं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी गृह विभागाचं आणि पोलीस अधीक्षक यासाठी जबाबदार असल्याचे म्हटलं. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बीडमध्ये घरे जाळपोळ करण्यापर्यंत मजल गेली. अंतरवाली सराटी इथं पोलिसांवर अमानुषपणे दगडफेक झाली. ७० पोलीस रुग्णालयात दाखल झाले. हिंमत असेल तर महिला पोलिसांना विचारा तुमच्यासोबत कशी वागणूक झाली त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केलेला आहे. पहिली बाजू जनतेसमोर आली नाही.त्याला पोलीस अधीक्षक आणि गृह विभागही जबाबदार आहे. मी गृहमंत्र्यांशी बोललो, पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होईल असं करू नका. पोलिसांना विश्वास दिला पाहिजे हे मी सांगितले. मी सर्वपक्षीय बैठकीतही हे बोललो. बीडवेळी पोलीस हतबल का झाले याबाबत चौकशी करून माहिती समोर आणावी अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्या ही मागणी आम्ही मान्य करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे परंतु ओबीसी कोट्यातून नाही. राज्य सरकारने आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. कुणी विरोध केला? सरसकट कुणबीच प्रमाणपत्र द्या याला विरोध आहे. ते होता कामा नये अशी स्पष्ट भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे. मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी असतील तर ते कुणबी होतील. परंतु काही ठिकाणी पूर्वी टाकाने लिहिले जायचे तिथे आता पेनाने कुणबी लिहिले जातेय त्याला विरोध आहे. अशी काही कागदे आम्ही दाखवली आहे. जो मुळात कुणबी आहे त्याला प्रमाणपत्रे द्या. आता खोडाखोडी करून कुणबी नोंदी दाखवल्या जातायेत. आरक्षण मिळून २७-२८ वर्ष झाली. जे खरोखरच कुणबी आहेत त्यांनी प्रमाणपत्रे मिळवली आहेत. आता अनेक प्रमाणपत्रावर कुणबी नोंदी लिहिल्या जात आहेत असा आरोप भुजबळांनी केला. 

माझा विरोध झुंडशाहीला

बीड पेटवलं कुणी हे का शोधत नाही? भुजबळांनी एक दगड, टायर तरी जाळला का? ज्यांनी जाळले त्याला पकडल्यानंतर आरोपींना सोडा अशी मागणी ते करतायेत. जो अन्याय झाला त्याला तोंड फोडायचे काम मी केले. मी जबाबदारीनं कागदपत्रासह जाहीर सभेत बोलतोय.  मराठा समाजाला माझा अजिबात विरोध नाही. वेगळे आरक्षण द्यायला विरोध नाही. ज्यावेळी तसा कायदा आला तेव्हा मी समर्थन दिले आहे. माझा विरोध झुंडशाहीला आहे. परवा एका मुलाखतीत पोलिसांनीच एकमेकांना मारल्याचे बोलले गेले. बीडमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनीही घरे जाळली असं सांगितले. यावर कुणी काय बोलणार आहे की नाही? असा सवाल भुजबळांनी केला आहे. 

२-४ लोकांना घाबरून बसणार का?

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पु्ण्यातील विश्रामगृहात येऊन विरोध केला, त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, मला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आजही फार आदर आहे. ज्या गादीवर ते बसलेत त्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र आपला आहे. या राज्यात जो घटक आहे त्याला सर्वांना समान न्याय द्या असं त्यांनी म्हटलं पाहिजे. अशा २-४ लोकांनी विरोध केला म्हणून घाबरून बसणार का? असंही भुजबळ म्हणाले. 

मी पक्षाविरोधात बोललो नाही

प्रत्येकाला आपापल्या समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. मी ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर समाजाची बाजू मांडतो. त्या व्यासपीठावर सगळ्याच पक्षाचे नेते असतात असंही छगन भुजबळांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील