शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मराठा नेत्यांना समोर बॅकवर्ड असे लावायचे नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 5:51 PM

कोल्हापूर : राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे ...

ठळक मुद्देमराठा नेत्यांना समोर बॅकवर्ड असे लावायचे नाही : चंद्रकांत पाटीलराजकारणासाठी कृषी विधेयकांना विरोध; शरद पवारांची भूमिका अनाकलनीय

कोल्हापूर : राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्किल होत आहे, याची जाणीव त्यांना नाही. आपला समाज केवळ आपल्यामागे फरफटत यावा, असेच यातील अनेकांची इच्छा आहे. गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्रात दोन्ही कॉग्रेसची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

ज्या कॉग्रेसने २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मांडले होते, तेच कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहेत. असे असताना कॉग्रेस केवळ आणि केवळ राजकारणासाठी या विधेयकाला विरोधाची भूमिका घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला.या विधेयकांबाबत सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी कोल्हापूर जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपच्या किसान आघाडीचे प्रमुख भगवान काटे, विजय आगरवाल, शंतनू मोहिते उपस्थित होते.ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या भल्यासाठीचे कायदे असतानाही शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित राहिले. त्यांची ही भूमिका अनाकलनीय आहे. या कायद्यांनुसार शेतकऱ्यांची बंधने कमी केली आहेत. शेतकऱ्यांना आता बाजार समितीप्रमाणेच कोणत्याही कंपनीलाही, कोणत्याही राज्यात माल विकता येणार आहे.

खासगी व्यापाऱ्यालाही देण्याची मुभा आहे. त्यांचे कोणतेही अधिकार काढून घेतलेले नाहीत. उलट बाजार समित्या, अडते, दलाल यांच्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत होते. ते टाळण्यासाठी ही विधेयके आणली गेली आहेत. जिथे दर जास्त तिथे माल विकण्याची परवानगी दिली असतानाही हा विरोध सुरू आहे.पंजाबमध्ये बहुतांश बाजार समित्या अकाली दलाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध होता; परंतु त्यांना आम्ही हे विधेयक शेतकरीविरोधी नसल्याचे समजून सांगितले आहेत. ते ह्यएनडीएह्णतून बाहेर पडलेले नाहीत, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. कंपन्यांशी करार करायचा काही नाही, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यावर बंधन नाही.पवारांच्या दट्ट्यानंतर शिवसेना बदललीलोकसभेत शिवसेनेने शेतकरीहिताच्या या विधेयकांना पाठिंबा दिला. मात्र शरद पवार यांचा दट्ट्या आल्यानंतर त्यांनी राज्यसभेत उलटी भूमिका घेतली. शिवसेनेचा हा नेहमीचा गोंधळ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.पाटील म्हणाले,

  • कंगना काय बोलतात, त्याचे दुष्परिणाम त्यांना कळत नाहीत. त्यांच्या सर्वच विधानांशी आम्ही सहमत आहोत असे नाही.
  • कंगनांप्रमाणेच गृहमंत्री अनिल देशमुख हे विचार न करताच बोलतात, हे त्यांच्या विधानांवरून स्पष्ट झाले आहे.
  • या सरकारचे सल्लागार कोण हेच समजत नाही. १३ टक्के मराठ्यांना आरक्षण ठेवून भरती केली तरी नंतरही १३ टक्क्यांमध्ये सर्व आरक्षणे द्यावी लागणार.
  • मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाला ठाकरे सरकारने लावले कुलुप.
टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर