शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

निवडणुका लगेच जाहीर करण्यात अनेक अडचणी; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही संदिग्धताच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:12 AM

सध्याच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण वगळून या निवडणुका होतील, असे राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील पाऊस कमी असलेल्या भागात आता आणि पाऊस अधिक पडणाऱ्या भागात पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असले तरी पावसाळ्यापूर्वी निवडणूक घेण्यात अनंत अडचणी आहेत. 

पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नसल्याने सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, हवामान खाते, महसूल खाते, गृह खाते अशा विविध महत्वाच्या विभागांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ. पण अंतिम निर्णयाप्रत येईपर्यंत किती काळ लागेल, यावर आता भाष्य करता येणार नाही. मुंबईत पाऊस नसेल. पण, ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.

मुंबई, ठाण्यासह १४ महापालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि २२० नगर पालिका व नगर पंचायतींची मुदत संपल्याने निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांच्या तारखांच्या दिवशी किंवा निवडणुकांच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता असल्यास तुम्ही निर्णय घ्या, असे आदेशात नमूद केले आहे.  आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो, असेही मदान यांनी सांगितले.

तूर्त ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका : मदान

मुंबईसह चौदा महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठीची प्रक्रिया जूनअखेरपर्यंत संपेल, तर मतदार यादी, आरक्षण  व प्रभाग  पुनर्रचनेबाबतची  जिल्हा परिषदांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत संपेल. सध्याच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण वगळून या निवडणुका होतील. एससी, एसटी व महिला अशी तीनच आरक्षण असतील. दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात समर्पित आयोगाचा अहवाल आला तर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रक्रिया पार पाडू, असे मदान यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय