शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कारखानदारांनी साखर उतारा चोरला, राजू शेट्टी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:37 IST

७००० कोटींची एफआरपी थकीत

सांगली : यंदाच्या हंगामात उसाचे उत्पन्न आणि साखर उताराही घटल्याचे दिसत आहे. या स्थितीत साखर कारखानदारांनी उतारा चोरल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. उसाची एफआरपी तुकड्यात न देता एकरकमी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहितीही त्यांनी दिली.सांगलीतील पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ऊस घटतो तेव्हा उतारा वाढतो. मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यंदा उत्पादित संपूर्ण साखर हिशेबात धरलेली नाही. उतारा चोरला आहे. मागीलवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे उसाच्या उत्पन्नात घट झाली. त्यावेळी उताराही घटला होता. यंदा मात्र हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखानदारांनी उताऱ्यात घट दाखवून साखर चोरली आहे. शेतकऱ्यांच्या साखरेवर दरोडा टाकला आहे. याविरोधात आम्ही आवाज उठविणार आहोत.केंद्र सरकारने एकरकमी एफआरपीबाबत तयार केलेला कायदा बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. परंतु, तत्कालीन महाविकास आघाडीने बदल केला. एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी आम्ही २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल लागला असून, राज्याचा निर्णय न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे.राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीररित्या एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करता येणार नाही, असे म्हटले आहे. सर्व कारखानदारांनी एकत्र येत रचलेल्या षडयंत्रावर आम्ही उच्च न्यायालयातील याचिकेतून विजय मिळविला आहे. कारखानदारांच्या चारीमुंड्या चीत करण्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यश आले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाविकास आघाडीने केलेला कायदा रद्द करून महायुती सरकारने शेतकऱ्यांची बाजू घेणे आवश्यक होते. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता कुणीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. याउलट महायुती सरकारनेही महाभियोक्ता बिरेंद्र सराफ यांना हस्तक्षेप करण्यास सांगून शेतकरीविरोधी भूमिका न्यायालयात मांडली.राज्यातील शेतकऱ्यांच्यावतीने मी दाखल केलेल्या याचिकेचे कामकाज ॲड. योगेश पांडे यांनी पाहिले. उच्च न्यायालयात बाजू मांडली. त्यामध्ये यश आले. या निर्णयाने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. पत्रकार परिषदेवेळी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

७००० कोटींची एफआरपी थकीततत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या एफआरपी तुकड्यात देण्याच्या निर्णयाचा गैरफायदा कारखानदारांनी घेतला. १०.२५ टक्के एफआरपी बेस पकडून तीन टप्प्यात एफआरपी दिला. आजही अनेक कारखान्यांचा हंगाम संपून महिना होत आला तरीही सुमारे ६ ते ७ हजार कोटी रुपयांची एफआरपी थकीत राहिली आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी