शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

कारखानदारांनी साखर उतारा चोरला, राजू शेट्टी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:37 IST

७००० कोटींची एफआरपी थकीत

सांगली : यंदाच्या हंगामात उसाचे उत्पन्न आणि साखर उताराही घटल्याचे दिसत आहे. या स्थितीत साखर कारखानदारांनी उतारा चोरल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. उसाची एफआरपी तुकड्यात न देता एकरकमी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहितीही त्यांनी दिली.सांगलीतील पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ऊस घटतो तेव्हा उतारा वाढतो. मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यंदा उत्पादित संपूर्ण साखर हिशेबात धरलेली नाही. उतारा चोरला आहे. मागीलवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे उसाच्या उत्पन्नात घट झाली. त्यावेळी उताराही घटला होता. यंदा मात्र हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखानदारांनी उताऱ्यात घट दाखवून साखर चोरली आहे. शेतकऱ्यांच्या साखरेवर दरोडा टाकला आहे. याविरोधात आम्ही आवाज उठविणार आहोत.केंद्र सरकारने एकरकमी एफआरपीबाबत तयार केलेला कायदा बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. परंतु, तत्कालीन महाविकास आघाडीने बदल केला. एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी आम्ही २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल लागला असून, राज्याचा निर्णय न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे.राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीररित्या एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करता येणार नाही, असे म्हटले आहे. सर्व कारखानदारांनी एकत्र येत रचलेल्या षडयंत्रावर आम्ही उच्च न्यायालयातील याचिकेतून विजय मिळविला आहे. कारखानदारांच्या चारीमुंड्या चीत करण्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यश आले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाविकास आघाडीने केलेला कायदा रद्द करून महायुती सरकारने शेतकऱ्यांची बाजू घेणे आवश्यक होते. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता कुणीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. याउलट महायुती सरकारनेही महाभियोक्ता बिरेंद्र सराफ यांना हस्तक्षेप करण्यास सांगून शेतकरीविरोधी भूमिका न्यायालयात मांडली.राज्यातील शेतकऱ्यांच्यावतीने मी दाखल केलेल्या याचिकेचे कामकाज ॲड. योगेश पांडे यांनी पाहिले. उच्च न्यायालयात बाजू मांडली. त्यामध्ये यश आले. या निर्णयाने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. पत्रकार परिषदेवेळी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

७००० कोटींची एफआरपी थकीततत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या एफआरपी तुकड्यात देण्याच्या निर्णयाचा गैरफायदा कारखानदारांनी घेतला. १०.२५ टक्के एफआरपी बेस पकडून तीन टप्प्यात एफआरपी दिला. आजही अनेक कारखान्यांचा हंगाम संपून महिना होत आला तरीही सुमारे ६ ते ७ हजार कोटी रुपयांची एफआरपी थकीत राहिली आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी