शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

‘एक्झिट पोल्स’नंतर गडकरींच्या घरी ‘मंथन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 5:25 AM

संघ सरकार्यवाहंची उपस्थिती : उत्तर प्रदेश, बंगालमधील स्थितीवरही चर्चा

नागपूर : ‘एक्झिट पोल्स’ने भाजपा व रालोआ परत सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे नेते सावध असून निकालानंतरच्या संभाव्य परिस्थितीवर संघभूमीत मंथन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह व्ही. भागय्या, पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत बराच वेळ चर्चा झाली.

एरवी संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ‘व्हीव्हीआयपी’ नेते संघ मुख्यालयात जातात. मात्र सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास अचानक भय्याजी जोशी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहोचले. कैलास विजयवर्गीय व व्ही.भागय्या हेदेखील त्याच सुमारास पोहोचले होते. त्यानंतर सुमारे दोन तास विविध मुद्यांवर सखोल मंथन झाले. प्रामुख्याने ‘एक्झिट पोल्स’मधील अंदाज, बंगाल व उत्तरप्रदेशमधील स्थिती व निकालानंतरची संभाव्य पावले यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान विजयवर्गीय यांनी मात्र ही बैठक पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. यात राजकीय विषयांवर नव्हे तर सामाजिक विषयांवर चर्चा झाली. देशाच्या विविध भागात ग्रामविकास, स्वदेशी तसेच अंत्योदय प्रकल्प राबविण्याबाबत ही बैठक होती, असे त्यांनी सांगितले.

भाजपाध्यक्षपदी शहाच हवेतअमित शहा यांचा भाजपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. सातत्याने दोनदा ते या पदावर होते. पुढील अध्यक्षपदाबाबत विजयवर्गीय यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता मी कुठल्याही स्पर्धेत नाही. अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपाने प्रभावी कामगिरी केली आहे. भाजपाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा तेच हवे. पक्षाने नियमांमध्ये शिथिलता आणली पाहिजे, असे ते म्हणाले.

प्रज्ञा सिंह चुकांची पुनरावृत्ती करणार नाहीभोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधानांनी मत मांडले असून त्यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्षाची ध्येय, धोरणे आणि विचारांची त्यांना पूर्ण माहिती नव्हती. आता त्यांना अनेक गोष्टीबाबत पक्षाचे मत आणि दृष्टिकोन कळला आहे. त्यामुळे भविष्यात त्या बोलताना दक्षता घेतील आणि चुकांची पुनरावृत्ती होऊ देणार नाहीत असे विजयवर्गीय म्हणाले.बंगालमध्ये भाजपला २० जागा मिळतीलमागील वेळी लोकसभा निवडणुकांत भाजपाला पश्चिम बंगालमध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा हा आकडा २० वर पोहोचेल. पश्चिम बंगालमध्ये गेल्या ३० वर्षांपासून निवडणुकीत हिंसाचार होतो. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक आणि हिंसाचार हे समानार्थी शब्द बनले आहेत. राज्यातील जनता या सर्व गोष्टींना कंटाळली असून त्यांना विकास हवा आहे. भाजपाला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीLok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोल