शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:36 IST

आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

बीड - खंडणीतल्या आरोपींना आम्हाला वाचवा म्हणून सरकारमधल्या मंत्र्‍याला मदत मागितली असणार आहे. या घटनेतील एकही आरोपी सुटता कामा नये. धनंजय मुंडेंची गुंडाची टोळी संपली पाहिजे. ही टोळी दहशत निर्माण करणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना भेटण्याची धनंजय मुंडेंची मानसिकता नाही. हा क्रूर आहे. खून करणाऱ्यापेक्षा त्याचा कट रचून गुन्हा घडवून आणणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. आरोपींना साथ देणारा सरकारमधीलच मंत्री आहे तोदेखील गुन्हेगार आहे असं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडेंवर भडकले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बीड कोर्टाने वाल्मीक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोर्टाबाहेर पोलिसांनाही धमक्या दिल्या जात आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी यांचा माज बघावा. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे पांगरीत त्यासाठीच आले. पाप झाकण्यासाठी गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला आहे. ही टोळी रस्त्यावर उतरून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. या टोळीमुळे एकाही गरीबाला त्रास होता कामा नये अन्यथा आम्हीही सहन करणार नाही असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय जातीय तेढ निर्माण करून दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांचा आहे. धनंजय मुंडे हा टोळ्या चालवतोय. परळीत आंदोलन त्याच्या सांगण्यावरून होतंय. मराठ्यांना आवाहन आहे शांततेचे भूमिका घ्या. न्यायालय आणि पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

दरम्यान, पांगरी जाऊन आरोपींच्या घरच्यांना मंत्री भेटतो. यानेच आंदोलन करणाऱ्या टोळीला जातीय तेढ निर्माण करण्यास सांगितले. मुख्यमंत्र्‍यांनी थांबवावं. कोर्टासमोर धिंगाणा करणार असतील. पोलिसांनी दादागिरी करू नये आम्ही सहन करणार नाही ही भाषा वापरली जाते. संचारबंदी लागू केली ती कुठे गेली...सामाजिक सलोखा ठेवायचा नाही. जिल्ह्याची शांतता भंग करायची. खूनातील आरोपीला पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडेंची टोळी करतेय. धनंजय मुंडे हा फडणवीस सरकारला लागलेला डाग आहे. धनंजय मुंडेंचाही खूनात हात आहे का अशी १०० टक्के आता शंका यायला लागली आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलwalmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे