शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:36 IST

आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

बीड - खंडणीतल्या आरोपींना आम्हाला वाचवा म्हणून सरकारमधल्या मंत्र्‍याला मदत मागितली असणार आहे. या घटनेतील एकही आरोपी सुटता कामा नये. धनंजय मुंडेंची गुंडाची टोळी संपली पाहिजे. ही टोळी दहशत निर्माण करणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना भेटण्याची धनंजय मुंडेंची मानसिकता नाही. हा क्रूर आहे. खून करणाऱ्यापेक्षा त्याचा कट रचून गुन्हा घडवून आणणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. आरोपींना साथ देणारा सरकारमधीलच मंत्री आहे तोदेखील गुन्हेगार आहे असं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडेंवर भडकले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बीड कोर्टाने वाल्मीक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोर्टाबाहेर पोलिसांनाही धमक्या दिल्या जात आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी यांचा माज बघावा. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे पांगरीत त्यासाठीच आले. पाप झाकण्यासाठी गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला आहे. ही टोळी रस्त्यावर उतरून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. या टोळीमुळे एकाही गरीबाला त्रास होता कामा नये अन्यथा आम्हीही सहन करणार नाही असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय जातीय तेढ निर्माण करून दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांचा आहे. धनंजय मुंडे हा टोळ्या चालवतोय. परळीत आंदोलन त्याच्या सांगण्यावरून होतंय. मराठ्यांना आवाहन आहे शांततेचे भूमिका घ्या. न्यायालय आणि पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

दरम्यान, पांगरी जाऊन आरोपींच्या घरच्यांना मंत्री भेटतो. यानेच आंदोलन करणाऱ्या टोळीला जातीय तेढ निर्माण करण्यास सांगितले. मुख्यमंत्र्‍यांनी थांबवावं. कोर्टासमोर धिंगाणा करणार असतील. पोलिसांनी दादागिरी करू नये आम्ही सहन करणार नाही ही भाषा वापरली जाते. संचारबंदी लागू केली ती कुठे गेली...सामाजिक सलोखा ठेवायचा नाही. जिल्ह्याची शांतता भंग करायची. खूनातील आरोपीला पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडेंची टोळी करतेय. धनंजय मुंडे हा फडणवीस सरकारला लागलेला डाग आहे. धनंजय मुंडेंचाही खूनात हात आहे का अशी १०० टक्के आता शंका यायला लागली आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलwalmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे