शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदायी; आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 19:02 IST

दाखले देण्याची प्रक्रिया सतत चालणारी आहे. ती अमुकअमुक तारखेपर्यंत पूर्ण करावी असा अट्टाहास करणे राज्याचे हिताचे नाही असं केसरकरांनी सांगितले. 

मुंबई - ओबीसी अथवा इतर कुठल्याही समाजाला न दुखावता महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवून मराठा आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारी २०२४ मध्ये मार्गी लागेल. फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदुप असेल असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत मनोज जरांगेंना आंदोलनाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. 

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, फेब्रुवारीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. सरकार सकारात्मक आणि सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मुंबईत येऊन आंदोलन छेडणे समाजाचे आणि राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेचा फेरविचारा करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार कुणबीचे दाखले देण्याबाबत जे जे करण्यासारखे आहे ते करण्यासाठी पूर्णत: सकारात्मक आहेत. दाखले देण्याची प्रक्रिया सतत चालणारी आहे. ती अमुकअमुक तारखेपर्यंत पूर्ण करावी असा अट्टाहास करणे राज्याचे हिताचे नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आतापर्यंत झालेले काम हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. ७० वर्षात जे काम कुणीही केले नाही ते काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केले आहे याची नोंद मराठा समाजाने घ्यावी. दुसऱ्याबाजूला कुणबी नोंदी आढळणार नाही अशा मराठा समाजासाठी सरकार सुप्रीम कोर्टातील क्युरेटिव्ह पीटिशनच्या माध्यमातून गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. त्यासाठी २३ ते ३१ जानेवारी या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील घटकांचे व्यापक सर्वेक्षण होत आहे. यात अंदाजे ३ कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण होईल. या कामासाठी सरकारने दीड लाख अधिकारी, कर्मचारी नियुक्त केलेत अशीही माहिती दीपक केसरकर यांनी दिली. 

दरम्यान, मराठा समाजासाठी होणारे सर्वेक्षण एखाद्या जात समुहाच्या आरक्षणासाठी केले जाणारे देशातील सर्वात मोठे सर्वेक्षण असणार आहे. मराठा आरक्षणाचा पाया कायदेशीरदृष्ट्या भक्कम करण्यासाठी सरकारचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आवश्यकता भासल्यास या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी महिन्यात एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची संपूर्ण तयारी सरकारने केली आहे असंही मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील