शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

“बैठक पुढे ढकलली म्हणून फडणवीसांचा डाव हुकला, सर्वांना पाणी पाजणार”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:06 IST

Manoj Jarange Patil News: लाडकी बहिणीला पैसे दिले, पण आमच्या आरक्षणाचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सातत्याने आसूड ओढताना दिसत आहेत. महायुती सरकारच्या धोरणांवर, योजनांवरही सातत्याने टीका करत आहेत. अशातच यावेळी सर्वांना पाणी पाजणार, करेक्ट कार्यक्रम करणार, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला. तसेच लाडकी बहिणीला पैसे दिले, पण आमच्या आरक्षणाचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मी यांचा कार्यक्रम लावतो. आता आखाडा जवळ आला आहे. सावध राहण्याची गरज आहे. या वेळेस सगळ्यांना पाणी पाजायचे आहे. यांना यांची जागा येणाऱ्या काळात दाखून द्यायची आहे. २९ तारखेची बैठक रद्द केली. उमेदवार उभा करायचे म्हटले की भाजपा खुश होते. पण मी त्यांच्यापेक्षा पुढचा आहे. या निवडणुकीत यांना पाणीच पाजायचेच आहे. यांना खुर्ची मिळू द्यायची नाही. हे सरकार मराठा समाजाचा मुळावर उठले आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

मराठा समाजाचा धसका घेत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली

आमची लेकरे जेलमध्ये घातली. त्यांना सरळ करणार आहे. रेकॉर्ड शोधणे बंद आहे. हे संपूर्ण देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून होत आहे.ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा हिशोब चुकता करणार आहे. लेकरांवर झालेला अन्याय विसरू नका. त्यादिवशी यांचा करेक्ट कार्यक्रम करा. मराठा समाजाचा धसका घेत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली होती. मी डाव टाकला आणि २९ तारखेला होणारी बैठक पुढे ठेवली. तिथेच देवेंद्र फडणवीस यांचा डाव हुकला, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. 

दरम्यान, राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी वातावरण गढूळ केले. मी मॅनेज होणारा नाहीं म्हणून माझ्याविरोधात डाव रचला जातो. हा देवेंद्र फडणवीसांचा गनिमी कावा आहे. हैदराबादला साडेतीन हजार कुणबी नोदीचे पुरावे सापडले असतानाही देवेंद्र फडणवीस इकडे आणू देत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांवर अन्याय केला आहे, असे टीकास्त्र मनोज जरांगे पाटील यांनी सोडले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४