शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:55 IST

Manoj Jarange Patil Dasara Melava 2025: रुग्णालयात उपचार सुरू असूनही दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली.

Manoj Jarange Patil Dasara Melava 2025: विजयादशमी दसरा संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय आखाडाही रंगतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील यांचे दसरा मेळावे जोरदार झाले. यासह ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचाही दसरा मेळावा आहे. रुग्णालयात उपचार सुरू असूनही दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली. बीडमधील नारायण गडावर दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला. 

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आणि धर्मवीर संभाजीराजे यांना वंदन करून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. याच दरम्यान “मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे...”, असे म्हणत भावनिक साद घातली. खूप वेदना आहेत, शरीराला त्रास होत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा. एक पाच, सहा महिन्यांपूर्वी एक गोष्टी सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचे कल्याण करू द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. 

सरकारने मदत दिली नाही तर आंदोलन करणार

मी सरकारला जाहीरपणाने सांगत आहे की, मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम दिवाळीच्या आत करायचे आहे. सरकारने दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे. सरकारने कॅश द्यावी. आता शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आहे. ज्यांचे शेत वाहून गेले नाही, त्यांना सरसकट ७० हजार रुपये हेक्टरी मदत करा. ज्यांच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेलेत, पीक वाहून गेले त्यांना १ लाख ३० हजार रुपये भरपाई म्हणून द्यावी. ज्यांचे जनावरे वाहून गेले, कांदा वाहून गेला, सोयाबीन वाहून गेले, धान्य वाहून गेले त्या लोकांचे शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यावी. सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी. सरकारने मदत दिली नाही तर आंदोलन करणार, सरकारला एक महिन्याची मुदत देत आहोत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, शेतकऱ्याचे ऊसाचे पंधरा रुपये कापायचे ठरवले आहे. अजिबात एक रुपया कापायचा नाही. याला पर्याय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये पगार आहे. त्याचे अडीच हजार रुपये कापा. ज्याला वीस हजार रुपये पगार आहे त्याचे पाच हजार रुपये कापा. ज्याला १ लाख पगार आहे त्याचे २५ हजार रुपये कापा. ज्याला २ लाख रुपये पगार आहे त्याचे ५० हजार रुपये कापा. चार-पाच लाख अधिकाऱ्यांचे पैसे कापले तर जवळपास हजार कोटी रुपये जमा होतील. फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन