शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

"माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेत"; संजय राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:00 IST

शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर विरोधकांनी टीका केली आहे.

Sanjay Raut on Manikrao Kokate: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन केलेल्या विधानावरुन शेतकऱ्यांसह विरोधक संतापलेले आहेत. अशातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कर्जमाफीवर बोलताना कृषीमंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. कर्जमाफीच्या पैशांनी काय करता असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी कृषीमंत्री कोकाटेंवर टीकेची झोड उठवली आहे. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

नाशिक येथे अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल विचारणा केली. त्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जातून मिळणाऱ्या पैशांबाबत शेतकऱ्यांनाच उलट सवाल केला. शेतकरी एक रुपयाची तरी गुंतवणूक करतो का असं माणिकराव कोकाटे म्हणाले. त्यावरुन विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. संजय राऊत यांच्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केले तर बरं होईल असं रोहित पवार म्हणाले.

"माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. माणिकराव कोकाटे हे राजकारणात अनेक वर्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत. अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणं ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केले आहेत असं वाटतं. स्वतः अजित पवार हे कॉमेडी शो करत आहे. प्रफुल पटेल यांचा देखील कॉमेडी शो सुरू आहे. राज्याचे कृषीमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. खिल्ली उडवत आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

"कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही. रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल," असं रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेSanjay Rautसंजय राऊतRohit Pawarरोहित पवार