शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

"माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेत"; संजय राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:00 IST

शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर विरोधकांनी टीका केली आहे.

Sanjay Raut on Manikrao Kokate: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन केलेल्या विधानावरुन शेतकऱ्यांसह विरोधक संतापलेले आहेत. अशातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कर्जमाफीवर बोलताना कृषीमंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. कर्जमाफीच्या पैशांनी काय करता असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी कृषीमंत्री कोकाटेंवर टीकेची झोड उठवली आहे. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

नाशिक येथे अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल विचारणा केली. त्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जातून मिळणाऱ्या पैशांबाबत शेतकऱ्यांनाच उलट सवाल केला. शेतकरी एक रुपयाची तरी गुंतवणूक करतो का असं माणिकराव कोकाटे म्हणाले. त्यावरुन विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. संजय राऊत यांच्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केले तर बरं होईल असं रोहित पवार म्हणाले.

"माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. माणिकराव कोकाटे हे राजकारणात अनेक वर्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत. अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणं ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केले आहेत असं वाटतं. स्वतः अजित पवार हे कॉमेडी शो करत आहे. प्रफुल पटेल यांचा देखील कॉमेडी शो सुरू आहे. राज्याचे कृषीमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. खिल्ली उडवत आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

"कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही. रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल," असं रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेSanjay Rautसंजय राऊतRohit Pawarरोहित पवार