शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
5
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
6
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
7
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
8
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
9
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
10
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
11
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
12
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
13
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
14
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
15
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा
16
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
17
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
18
जागतिक IVF दिन: IVF हा जोडप्यांसाठी आशेचा किरण; पण 'या' चुकांमुळे पदरी पडते निराशा!
19
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
20
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?

"माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेत"; संजय राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:00 IST

शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर विरोधकांनी टीका केली आहे.

Sanjay Raut on Manikrao Kokate: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन केलेल्या विधानावरुन शेतकऱ्यांसह विरोधक संतापलेले आहेत. अशातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कर्जमाफीवर बोलताना कृषीमंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. कर्जमाफीच्या पैशांनी काय करता असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी कृषीमंत्री कोकाटेंवर टीकेची झोड उठवली आहे. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

नाशिक येथे अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल विचारणा केली. त्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जातून मिळणाऱ्या पैशांबाबत शेतकऱ्यांनाच उलट सवाल केला. शेतकरी एक रुपयाची तरी गुंतवणूक करतो का असं माणिकराव कोकाटे म्हणाले. त्यावरुन विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. संजय राऊत यांच्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केले तर बरं होईल असं रोहित पवार म्हणाले.

"माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. माणिकराव कोकाटे हे राजकारणात अनेक वर्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत. अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणं ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केले आहेत असं वाटतं. स्वतः अजित पवार हे कॉमेडी शो करत आहे. प्रफुल पटेल यांचा देखील कॉमेडी शो सुरू आहे. राज्याचे कृषीमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. खिल्ली उडवत आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

"कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही. रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल," असं रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेSanjay Rautसंजय राऊतRohit Pawarरोहित पवार