शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

Sanjay Raut "मंत्री दीपक केसरकर यांना जोड्यानं मारलं पाहिजे", 'त्या' विधानावरून संजय राऊत यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 11:43 IST

Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांना जोड्यांनी मारलं पाहिजे आणि लोक त्यांना मारतील. जर शिवराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल असं  केसरकर यांना वाटत असेल तर ही मिंध्यांनी पोसलेली अफजल खानाची अवलाद आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

मालवणमधील राजकोट येथ उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच या घटनेविरोधात विरोधकांकडून आज मालवणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 

मालवणमध्ये शिवपुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत प्रतिक्र्या देताना  वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल आणि त्यामुळे हा अपघात घडला असेल, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, दीपक केसरकर यांना जोड्यांनी मारलं पाहिजे आणि लोक त्यांना मारतील. जर शिवराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल असं  केसरकर यांना वाटत असेल तर ही मिंध्यांनी पोसलेली अफजल खानाची अवलाद आहे. ही घाण आमच्याकडून गेली हे बरं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, हे शब्द यांच्या तोंडामधून कसे काय बाहेर पडू शकतात, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला. 

ते पुढे म्हणाले की, पुतळा पडला हा शुभशकुन आहे, यातून काही चांगलं घडेल, असं हे म्हणतात. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केले. हे देवेंद्र फडणवीस यांचंच पाप आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झाले आहेत, हे मला कळत नाही. मिंधे आणि त्यांची टोळी पोसण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हे काम नरेंद्र मोदी यांनी केलं. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पाडला, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSanjay Rautसंजय राऊतDeepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार