शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र विधानसभेत मला विरोधी पक्षनेता बनवा’, काँग्रेसच्या आमदाराचं थेट मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 09:30 IST

Sangram Thopte Letter To Mallikarjun Kharge: २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली राजकीय उलथापालथ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे.

२०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली राजकीय उलथापालथ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर काँग्रेस हा विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. यादरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले असून, विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्या नावाचा विचार करावा, अशी विनंती केली आहे.

सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर संग्राम थोपटे यांनी हे पत्र लिहिलं आहे. मात्र थोपटे यांनी हे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना न लिहिता थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठवलं आहे. सध्या महाराष्ट्र काँग्रेसकडे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत.

थोपटे यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले की, गेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र तेव्हा अजित पवार यांनी त्याला विरोध केला होता. आता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील राजकारण लक्षात घेऊन मी या संधीचा लाभ घेऊ शकतो. तसेच पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी काँग्रेस पक्षाला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर आणू शकतो.

चार महिन्यांपूर्वी पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. तिथे मी मुख्य पर्यवेक्षक होतो. तसेच मतदारांसोबत संपर्क साधण्याचं काम मी केलं होतं. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्येही मी पर्यवेक्षक होतो. थोपटे यांनी सांगितले की, जर काँग्रेसला भाजपा युतीविरोधात लढायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांवर तोडगा काढावा लागेल. त्यासाठी आपला अनुभव महत्त्वपूर्ण ठरेल, असेही थोपटे यांनी सांगितले.  

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे