शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर सरसकट दारुबंदी करा

By admin | Updated: June 14, 2015 02:39 IST

चंद्रपूरमधील दारुबंदीविरोधात न्यायालयात गेलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे ‘लोकमत’शी बोलताना

राधाकृष्ण विखे : राज्यभरात समान धोरणाची मागणी

श्रीरामपूर (अहमदनगर) : चंद्रपूरमधील दारुबंदीविरोधात न्यायालयात गेलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे ‘लोकमत’शी बोलताना केवळ एखाद्या जिल्ह्यापुरती दारुबंदी न करता राज्यभरात सरसकट एकदाच दारुबंदी करा, अशी जाहीर भूमिका प्रथमच मांडली.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ते शनिवारी येथे आले होते. डॉ. केळकर समितीने शेतकरी आत्महत्येमागे दारूचे व्यसन हे एक कारण आहे. त्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, की वर्धा जिल्ह्यात फार वर्षांपासून संपूर्ण दारुबंदी करण्यात आली आहे. पण तेथेच सर्वाधिक दारुविक्री होते. आता युती सरकारने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी जाहीर केली आहे. हा निर्णय पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा आहे. एखाददुसऱ्या जिल्ह्यात दारुबंदी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्याऐवजी सरसकट संपूर्ण राज्यात दारुबंदी झाली पाहिजे. आमचा कारखाना गेल्या ४० वर्षांपासून दारुनिर्मिती करतो. तिची चंद्रपूरसह राज्यभरात विक्री होते. त्यातून कारखान्यास आर्थिक उत्पन्न मिळते. दारुबंदीचे स्वागतचचंद्रपूरच्या दारुबंदीमुळे कारखान्याचा निश्चित आर्थिक तोटा होणार आहे, म्हणून विखे साखर कारखाना न्यायालयात गेला आहे. पण आम्ही दारुबंदीविरोधात नाही. दारुबंदीच्या निर्णयाचे मी स्वागतच करतो. पण राज्यभरात एकच कायदा व समान धोरण असले पाहिजे, असे विखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)