शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार; १४ जानेवारीला राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 10:31 IST

महायुतीत इतके घटक पक्ष एकत्र येणार आहेत. महायुतीत सगळे नेते दिसतील विरोधात कुणीही दिसणार नाही असं बावनकुळेंनी सांगितले. 

मुंबई - १४ जानेवारीपासून राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हास्तरीय महायुतीचे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होतील. जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यापासून बूथपर्यंत आणि फेब्रुवारीत विभागीय मेळावे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात होतील. रामदास आठवले, विनय कोरे, महादेव जानकार, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत हे घटक पक्षाचे नेतेही मेळाव्याला हजर राहतील. मोदींच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड मोठे यश महाराष्ट्रात मिळेल. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकणार आहोत. आम्ही तिन्ही पक्षांनी तशी तयारी केली आहे. तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना आखली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही राज्यभरात दौरे करतोय. ५० हजार नागरिकांच्या मतदानाचा विचार केला तर २०२४ मध्ये पंतप्रधान कोण हवेत तर ४७ हजार ४१२ लोकांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत असं म्हटलं. मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बळ, या राज्यातील संपूर्ण समाज मोदींच्या नेतृत्वाखाली भारत निर्माण होण्यासाठी पाठिशी उभा आहे. जसजसं मोदींच्या नावाचं वादळ महाराष्ट्रात येईल तसतसं महायुतीच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशासाठी निमंत्रण येत आहेत. महायुतीत इतके घटक पक्ष एकत्र येणार आहेत. महायुतीत सगळे नेते दिसतील विरोधात कुणीही दिसणार नाही असं त्यांनी सांगितले. 

मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे सहभागी होते. यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या १० वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशानं नवी उंची गाठली. महायुतीचे एकत्रित मेळावे जानेवारीपासूनच सुरू होत आहेत. १४ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात महायुतीचे मेळावे एकाचवेळी सुरू होतील. मोठ्या संख्येने कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहतील. याआधी वरळी इथं महायुतीचा मेळावा झाला होता. आता जिल्हा पातळीवर मित्रपक्षात व्यापक संपर्क व्हावा. ६ प्रादेशिक विभागात जिल्हा मेळावे घेणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावे फेब्रुवारीपासून सुरू होतील अशी माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक चांगले निर्णय देशपातळीवर झाले. राज्यातही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात जे काही चांगले निर्णय झालेत ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे, शासन आपल्या दारी या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना योजना पोहचवल्या आहेत. आता गावपातळीवरील घटक पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोमलिन, संवाद घडवणे त्यातून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत संघटितपणे मार्गक्रमण करण्यात येणार आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पुढील रणनीती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार