शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘महायुती लोकसभा निवडणुकीत ४५, तर विधानसभेमध्ये एवढ्या जागा जिंकेल’, उदय सामंतांनी सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 17:56 IST

Uday Samant: महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभा निवडणुकीत २१५ जागा जिंकेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. 

नुकत्याच झालेल्या राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसले होते. या तिन्ही पक्षांनी समर्थन दिलेल्या पॅनेलनी १४०० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व मिळवले होते. दरम्यान, या यशानंतर महायुतीमधील नेत्यांचा आत्मविश्वाच चांगलाच वाढलेला दिसत आहे. महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभा निवडणुकीत २१५ जागा जिंकेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीचा संदर्भ देत उदय सामंत म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत आपणं पाहिलं की, २३०० ग्रामपंचायतींपैकी १४०० पेक्षा जास्त सरपंच हे महायुतीचे निवडून आले. साडे चारशे जे इतर सरपंच निवडून आले आहेत. त्यापैकी सव्वाशे ते दीडशे सरपंच हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर तेवढेच सरपंच भाजपा आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातील जनतेनं महायुतीला स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे खासदारकी आणि आमदारकी आमच्यादृष्टीने फार सोपी आहे. लोकसभेमध्ये आम्ही ४५ जागा जिंकू आणि विधानसभेच्या २१५ जागा आम्ही जिंकू, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

निधीवरून नाराजी आहे का असं विचारलं असता उदय सामंत म्हणाले की, निधिवाटपावरून कुणी नाराज असेल असं मला वाटत नाही. महायुतीमध्ये गैरसमज निर्माण व्हावा. महायुतीतील घटक पक्षांमध्ये दुरावा निर्माण व्हावा, असं यामधून काही लोकांना वाटतं. मात्र असं काहीही होणार नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.   

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस