शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

‘महायुती लोकसभा निवडणुकीत ४५, तर विधानसभेमध्ये एवढ्या जागा जिंकेल’, उदय सामंतांनी सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 17:56 IST

Uday Samant: महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभा निवडणुकीत २१५ जागा जिंकेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. 

नुकत्याच झालेल्या राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसले होते. या तिन्ही पक्षांनी समर्थन दिलेल्या पॅनेलनी १४०० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व मिळवले होते. दरम्यान, या यशानंतर महायुतीमधील नेत्यांचा आत्मविश्वाच चांगलाच वाढलेला दिसत आहे. महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभा निवडणुकीत २१५ जागा जिंकेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीचा संदर्भ देत उदय सामंत म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत आपणं पाहिलं की, २३०० ग्रामपंचायतींपैकी १४०० पेक्षा जास्त सरपंच हे महायुतीचे निवडून आले. साडे चारशे जे इतर सरपंच निवडून आले आहेत. त्यापैकी सव्वाशे ते दीडशे सरपंच हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर तेवढेच सरपंच भाजपा आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातील जनतेनं महायुतीला स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे खासदारकी आणि आमदारकी आमच्यादृष्टीने फार सोपी आहे. लोकसभेमध्ये आम्ही ४५ जागा जिंकू आणि विधानसभेच्या २१५ जागा आम्ही जिंकू, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

निधीवरून नाराजी आहे का असं विचारलं असता उदय सामंत म्हणाले की, निधिवाटपावरून कुणी नाराज असेल असं मला वाटत नाही. महायुतीमध्ये गैरसमज निर्माण व्हावा. महायुतीतील घटक पक्षांमध्ये दुरावा निर्माण व्हावा, असं यामधून काही लोकांना वाटतं. मात्र असं काहीही होणार नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.   

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस