शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महावितरणचा ‘महाप्रताप’ .. एक बल्बसाठी तब्बल अकरा लाखाचे बिल.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 20:29 IST

आदिवासी भागातील बेचाळीस गावे गेली अनेक महिने चुकीच्या बिलांमुळे ञस्त असुन योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी करत असूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.  

ठळक मुद्देआर्थिक नुकसान होत असुन वेळ वाया जात असल्याची आदिवासी भागातील ग्राहकांची तक्रार निदान फोटो नाही पण प्रत्येक मीटरचे रीडींग घेतले जावे अशी नागरिकांची अपेक्षा वाडा विभागासाठी ना अधिकारी ना वायरमन भोरगीरी फीडर अंतर्गत साडे तीन हजार ग्राहक असुन निम्मी बिले चुकीची दिली गेली आहेत.

अयाज तांबोळी  खेड (डेहणे) : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा विभागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याला आधीच शेतकरी वैतागला असताना आता गेली सहा महिने येणारे भरमसाठ वीजबिलामुळे ग्राहक व शेतक-यांचा वाडा अंतर्गत येणाऱ्या ४२ अदिवासी गावांमधील ग्राहकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.  भोरगिरी फीडर अंतर्गत साडे तीन हजार ग्राहक असुन निम्मी बिले चुकीची दिली गेली आहेत.

डेहणे येथील एक ग्राहक गंगा केशु भालेराव यांना ११,५२,९४० रुपये बिल आले आहे. त्यांच्या घरात फक्त एकच महिला राहत असून एका महिन्यात एका बल्बसाठी ७१५२७  युनिट वीज वापर दाखवण्यात आला आहे , अशी अनेक बिले ग्राहकांना देण्यात आली आहेत. आदिवासी भागातील बेचाळीस गावे गेली अनेक महिने चुकीच्या बिलांमुळे ञस्त असुन योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी करत असूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.  प्रत्येक महिन्याला चुकीच्या रिडींगमुळे येणारे भरमसाठ बिलामुळे व्यावसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय बिल दुरूस्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी राजगुरुनगरला जावे लागत असल्याने आर्थिक नुकसान होत असुन वेळ वाया जात असल्याची आदिवासी भागातील ग्राहक तक्रार करत आहेत. गेली कित्येक महिने वीज रिडींग घेतले जात नाही, खरे तर मीटर रिडींगचे फोटो घेणे आवश्यक आहे. निदान फोटो नाही पण प्रत्येक मीटरचे रीडींग घेतले जावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. दुरूस्तीसाठी बिलापेक्षा जास्तीचा खर्च होत असुन ग्राहकांना  आर्थिक नुकसान होत आहे. महावितरण विभागाकडुन रिडींगसाठी कर्मचारी नेमण्याची गरज आहे.                         ------------                    नवीन काम निकृष्ट भोरगिरी फिडरचे कंडक्टर ( वीजवाहिन्या) बदलण्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे, परंतु ११ केव्हीसाठी ३३ केव्ही चे साहित्य वापरणे, चुकीच्या पद्धतीने दिलेला ताण तसेच बदलेले पोल खोलवर नसल्याने पावसाळ्यात अनेक पोल पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वीज जाण्याचा झटका आदिवासी भागातील जनतेला सहन करावा लागणार आहे.   पावसाळ्यापूर्वी कराव्यात अशा दुरुस्तीच्या कामाचे अद्याप नियोजन नसल्याने वादळ व अल्प प्रमाणात पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित होऊन यंत्रणेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. तसेच ट्री कटींग, रोहित्र , फ्युज, पटट्या बदलणे तसेच किरकोळ  दुरुस्ती कामे निघत असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा वीज ग्राहकांना नाहक त्रास होत आहे.                              -----------वाडा विभागासाठी ना अधिकारी ना वायरमन वाडा विभागासाठी सध्या शाखा अभियंता या पदावर कार्यरत अधिकारीच नाही. पूर्वीच्या अधिकारी बदलुन गेल्यावर हंगामी  अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सांगितले जाते. परंतु, हे अधिकारी कार्यक्षेञात फिरकत नसल्याने रिडींग बरोबर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.  तसेच भोरगिरी फिडरसाठी पाच वायरमन आवश्यक असताना आव्हाट ते भोरगिरी परिसरातील २७ गावांना एकही वायरमन नाही. विशेष म्हणजे कंत्राटी नेमलेल्या आऊटसोर्सिगच्या कामचलाऊ वायरमनलाही कमी करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या आदिवासी भागातील बेचाळीस गावे रामभरोसे असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Khedखेडmahavitaranमहावितरण