शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महावितरणची थकबाकी ६६ हजार कोटी; ऊर्जामंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 07:42 IST

प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी महावितरण वरील आर्थिक बोजा कमी करण्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तरात मंत्री राऊत म्हणाले की, जानेवारी २०२२ अखेर पर्यंतची ही थकबाकी आहे.

मुंबई :  राज्यभरात महावितरणची तब्बल ६६ हजार ८१७ कोटींची थकबाकी असून यात घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांकडून ४२ हजार २६९ कोटींची वीजबिलांची रक्कम येणे बाकी आहे. याशिवाय, रस्त्यांवरील दिवाबत्ती, सार्वजनिक आस्थापनांसह सेवापोटी असलेल्या वीज बिलांचा समावेश आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरूवारी विधानपरिषदेत दिली.प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी महावितरण वरील आर्थिक बोजा कमी करण्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तरात मंत्री राऊत म्हणाले की, जानेवारी २०२२ अखेर पर्यंतची ही थकबाकी आहे. राज्य सरकारने कृषी वीज जोडणी धोरण आणले असून यात शेतकऱ्यांसाठी ५० टक्के वीज दर शुल्क निर्लेखित करण्यात आले आहे. विलंब आकारही माफ केला आहे. या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने नवीन योजना आणली जाईल, त्यात वीज बिल संदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे लिफ्ट एरिगेशन बाबत धोरण लवकरच आणले जाईल, असे आश्वासन राऊत यांनी दिले. एक लाख कृषिपंप देण्याचे उद्दिष्ट असून निधीची कमतरता भासणार नसल्याचे ऊर्जामंत्री म्हणाले. नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्न विचारला होता. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण