शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या शेतकरी, कोरोनाबाबतच्या समस्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:46 IST

विदर्भासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच महाविकास आघाडीचे विदर्भातील आमदार यांची संयुक्त बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्यात आली.

यवतमाळ : जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती काय आहे व कुठल्या समस्या प्राधान्याने सोडवाव्या लागतात, हे जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विदर्भातील मंत्री, आमदारांची बैठक घेतली. यात जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांपुढे जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. त्यावर उपाययोजना करण्याचे तत्काळ निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विदर्भासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच महाविकास आघाडीचे विदर्भातील आमदार यांची संयुक्त बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराला त्यांच्या काय समस्या आहे, कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे याची विचारणा केली. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनील नाईक यांनी या बैठकीत जिल्ह्यातील समस्या मांडल्या.आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील काही उणिवा बैठकीत ठेवल्या. मेडिकल कॉलेजमध्ये अमरावती, वाशिम, नांदेड या जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा राज्यातूनही रुग्ण उपचाराला येतात. रुग्णांची संख्या पाहता येथील साधन सामुग्री कमी पडत आहे. काही पदांची नव्याने निर्मिती तर काही रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला. याला ना.राठोड व आमदार इंद्रनील नाईक या दोघांनीही सहमती दर्शविली. तर आमदार इंद्रनील नाईक यांनी खत टंचाईचा मुद्दा मांडला. पुसद व लगतच्या परिसरात खताचा पुरवठा करण्यासाठी वाशिम येथे रॅक पॉर्इंट देण्यात यावा, अशी मागणी केली. याला पालकमंत्र्यांनीसुद्धा अनुमोदन दिले. हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा, असे निर्देश बैठकीतूनच संबंधितांना मुख्यमंत्र्यांनी दिले.याशिवाय जिल्ह्यातील शेतकºयांची, पीक विमा, पीककर्ज वाटप याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. लॉकडाऊनबाबत काय निर्णय घ्यावा यावरही स्थानिक मंत्री आमदारांचे मत घेतले. यावर आमदार इंद्रनील नाईक व आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी लॉकडाऊन करण्यात यावा, असे सूचविले. आता प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जाईल, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय अधिवेशनाच्या आयोजनाबाबतही निर्णय होईल, असे सांगितले. सरकारला पाच वर्षे धोका नाहीराज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला पाच वर्ष धोका नाही. सर्वांच्या सूचना व अपेक्षांना योग्य न्याय देवू, हे सरकार पाच वर्ष यशस्वीरित्या काम करेल असा विश्वास या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्रMLAआमदारUddhav Thackerayउद्धव ठाकरे