शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या शेतकरी, कोरोनाबाबतच्या समस्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:46 IST

विदर्भासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच महाविकास आघाडीचे विदर्भातील आमदार यांची संयुक्त बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्यात आली.

यवतमाळ : जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती काय आहे व कुठल्या समस्या प्राधान्याने सोडवाव्या लागतात, हे जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विदर्भातील मंत्री, आमदारांची बैठक घेतली. यात जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांपुढे जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. त्यावर उपाययोजना करण्याचे तत्काळ निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विदर्भासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच महाविकास आघाडीचे विदर्भातील आमदार यांची संयुक्त बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराला त्यांच्या काय समस्या आहे, कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे याची विचारणा केली. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनील नाईक यांनी या बैठकीत जिल्ह्यातील समस्या मांडल्या.आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील काही उणिवा बैठकीत ठेवल्या. मेडिकल कॉलेजमध्ये अमरावती, वाशिम, नांदेड या जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा राज्यातूनही रुग्ण उपचाराला येतात. रुग्णांची संख्या पाहता येथील साधन सामुग्री कमी पडत आहे. काही पदांची नव्याने निर्मिती तर काही रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला. याला ना.राठोड व आमदार इंद्रनील नाईक या दोघांनीही सहमती दर्शविली. तर आमदार इंद्रनील नाईक यांनी खत टंचाईचा मुद्दा मांडला. पुसद व लगतच्या परिसरात खताचा पुरवठा करण्यासाठी वाशिम येथे रॅक पॉर्इंट देण्यात यावा, अशी मागणी केली. याला पालकमंत्र्यांनीसुद्धा अनुमोदन दिले. हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा, असे निर्देश बैठकीतूनच संबंधितांना मुख्यमंत्र्यांनी दिले.याशिवाय जिल्ह्यातील शेतकºयांची, पीक विमा, पीककर्ज वाटप याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. लॉकडाऊनबाबत काय निर्णय घ्यावा यावरही स्थानिक मंत्री आमदारांचे मत घेतले. यावर आमदार इंद्रनील नाईक व आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी लॉकडाऊन करण्यात यावा, असे सूचविले. आता प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जाईल, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय अधिवेशनाच्या आयोजनाबाबतही निर्णय होईल, असे सांगितले. सरकारला पाच वर्षे धोका नाहीराज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला पाच वर्ष धोका नाही. सर्वांच्या सूचना व अपेक्षांना योग्य न्याय देवू, हे सरकार पाच वर्ष यशस्वीरित्या काम करेल असा विश्वास या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्रMLAआमदारUddhav Thackerayउद्धव ठाकरे