सांगली : महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा दोन महिन्यांपासून रुग्णालयांना मिळालेला नाही. राज्यभरातील ३५ जिल्ह्यांतील रुग्णालयांची थकबाकी ६४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.या योजनेंतर्गत उपचारांची बिले आरोग्य हमी सोसायटीकडे पाठविली जातात. तेथे ४५ दिवसांत मंजुरी मिळून रुग्णालयांकडे पैसे जमा होतात. मात्र, दोन महिने झाले, तरी पैसे मिळालेले नाहीत. याचा मोठा ताण छोट्या रुग्णालयांवर पडत आहे.जिल्हानिहाय थकीत रक्कम
- अहिल्यानगर - ४४,१४,९७,१७०
- अकोला - १५,०७,४५,०४०
- अमरावती - १८,२६,५५,०००
- बीड - १०,०५,४०,१६०
- भंडारा - १७,५१,२०००
- बुलढाणा - ९,३१,७६,३४०
- चंद्रपूर - १,७५,६२,२००
- छत्रपती संभाजीनगर - ४८,६६,४७,४७०
- धाराशिव - ३,२०,९४,७५०
- धुळे - १६,२५,३८,५८०
- गडचिरोली - ५२,३६,६००
- गोंदिया - २,९३,३८,७६०
- हिंगोली - ९६,३३,३००
- जळगाव - १७,३७,२१,१७०
- जालना - १५,३६,७५०
- कोल्हापूर - ३४,०३,३,२२०
- लातूर - १२,४७,५४,३७०
- मुंबई व मुंबई उपनगर - ४४,६०,७५,३२०
- नागपूर - ३९,५९,९९,३२०
- नांदेड - १५,९२,९२,५६०
- नंदुरबार - २,७०,९३,९१०
- नाशिक - ८०,४५,९०,९५५
- पालघर - ३,०६,३५,२००
- परभणी - २,३७,१७,४२०
- पुणे - ४६,५२,४८,५६५
- रायगड - १२,०५,८७,८३०
- रत्नागिरी - ६,३७,१३,७२०
- सांगली - २५,२२,८७,७६०
- सातारा - २०,१०,१५,३००
- सिंधुदुर्ग - २,७८,५६,६२०
- सोलापूर - २९,१८,६९,७६०
- ठाणे - ३९,२९,८२,६७०
- वर्धा - १४,५७,८०,७००
- वाशिम - ५,९४,१९,२५०
- यवतमाळ - ४,७६,६४,५००
- एकूण : ६४७ कोटी ७६ लाख ८८ हजार २४० रुपये
रुग्णालयांची बिले थकली असली, तरी एकही रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. गरजू व पात्र रुग्णांवर या योजनेतून उपचार सुरू आहेत. - डाॅ. सुभाष नांगरे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले योजना