शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मिळाले सर्वाधिक ९२ पुरस्कार; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 06:34 IST

स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे.

मुंबई : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण २०२१ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक तब्बल ९२ पुरस्कार पटकावले आहेत. सर्वेक्षणातील ४० टक्के पुरस्कार एकट्या महाराष्ट्राला मिळाले. ६५९ जिल्ह्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ३३ जिल्ह्यांचा समावेश असून, देशातील प्रमुख १०० स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राज्यातील २३ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे.  यातून राज्याची मान देशातच नाही, तर जगातही गौरवाने उंचावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पुरस्कारप्राप्त नगरपालिकांचे अभिनंदन करण्यात आले.

स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे. सर्व समावेशक कॅटेगरीत नवी मुंबई शहराची एका स्थानाने घसरण झाली असून, यंदा नवी मुंबई चौथ्या स्थानावर आहे.वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४७ शहरांचा समावेश  आहे. यामध्ये  राज्यातील ५५ शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४३ शहरे आहेत, त्यात महाराष्ट्रातील ६४ शहरांचा समावेश आहे. फाइव्ह स्टार मानांकनामध्ये देशभरातील ९ शहरांना  सन्मानित करण्यात आले, त्यामध्ये राज्यातील नवी मुंबईचा समावेश आहे.

शांताबाई झाल्या भावुक गेल्या ३४ वर्षांपासून हातात झाडू घेऊन विटा शहराची सेवा करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी शांताबाई उत्तम हत्तीकर यांना राष्ट्रपतींच्या व्यासपीठावर जाण्याचे भाग्य मिळाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रपतींना शांताबाईंची ओळख करून दिली. या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने शांताबाई भावुक झाल्या होत्या.

६५९ जिल्ह्यांमध्ये राज्यातील ३३ जिल्ह्यांचा समावेशपुणे (१३), धुळे (२०), ठाणे (२१), चंद्रपूर (२४), सातारा (३५), नाशिक (३७), कोल्हापूर (४३), रायगड (४४), सांगली (४७), नागपूर (५०), सोलापूर (५१), परभणी (५६), औरंगाबाद (५९), नगर (६५), हिंगोली (६६), लातूर (६७), अमरावती (७२), जालना (८३), नंदुरबार (९०), नांदेड (९४), रत्नागिरी (९७), पालघर (९८) आणि सिंधुुदुर्ग (९९).

महाराष्ट्राने स्वच्छतेच्या चळवळीत आघाडी ठेवली आहे. लोकसहभाग हा स्वच्छता चळवळीचा आत्मा आहे. स्वच्छतेची ही चळवळ अशीच अव्याहतपणे सुरू राहावी. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने करता येतील ते सर्व प्रयत्न करत राहूया.-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई