शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मिळाले सर्वाधिक ९२ पुरस्कार; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 06:34 IST

स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे.

मुंबई : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण २०२१ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक तब्बल ९२ पुरस्कार पटकावले आहेत. सर्वेक्षणातील ४० टक्के पुरस्कार एकट्या महाराष्ट्राला मिळाले. ६५९ जिल्ह्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ३३ जिल्ह्यांचा समावेश असून, देशातील प्रमुख १०० स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राज्यातील २३ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे.  यातून राज्याची मान देशातच नाही, तर जगातही गौरवाने उंचावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पुरस्कारप्राप्त नगरपालिकांचे अभिनंदन करण्यात आले.

स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे. सर्व समावेशक कॅटेगरीत नवी मुंबई शहराची एका स्थानाने घसरण झाली असून, यंदा नवी मुंबई चौथ्या स्थानावर आहे.वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४७ शहरांचा समावेश  आहे. यामध्ये  राज्यातील ५५ शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४३ शहरे आहेत, त्यात महाराष्ट्रातील ६४ शहरांचा समावेश आहे. फाइव्ह स्टार मानांकनामध्ये देशभरातील ९ शहरांना  सन्मानित करण्यात आले, त्यामध्ये राज्यातील नवी मुंबईचा समावेश आहे.

शांताबाई झाल्या भावुक गेल्या ३४ वर्षांपासून हातात झाडू घेऊन विटा शहराची सेवा करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी शांताबाई उत्तम हत्तीकर यांना राष्ट्रपतींच्या व्यासपीठावर जाण्याचे भाग्य मिळाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रपतींना शांताबाईंची ओळख करून दिली. या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने शांताबाई भावुक झाल्या होत्या.

६५९ जिल्ह्यांमध्ये राज्यातील ३३ जिल्ह्यांचा समावेशपुणे (१३), धुळे (२०), ठाणे (२१), चंद्रपूर (२४), सातारा (३५), नाशिक (३७), कोल्हापूर (४३), रायगड (४४), सांगली (४७), नागपूर (५०), सोलापूर (५१), परभणी (५६), औरंगाबाद (५९), नगर (६५), हिंगोली (६६), लातूर (६७), अमरावती (७२), जालना (८३), नंदुरबार (९०), नांदेड (९४), रत्नागिरी (९७), पालघर (९८) आणि सिंधुुदुर्ग (९९).

महाराष्ट्राने स्वच्छतेच्या चळवळीत आघाडी ठेवली आहे. लोकसहभाग हा स्वच्छता चळवळीचा आत्मा आहे. स्वच्छतेची ही चळवळ अशीच अव्याहतपणे सुरू राहावी. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने करता येतील ते सर्व प्रयत्न करत राहूया.-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई